बोरीवली - अभिनवनगर परिसरातील गेले अनेक दिवसांपासून मलेरिया आणि हिवतापाची साथ पसरलीय. याच्यावर खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेनं ही जोरदार प्रयत्न सुरु केलेत. त्याच्याच पार्श्वभूमीवर पालिकेकडून या ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली. मात्र त्याच परिसरातील काजूपाडा बस स्टॉपजवळ साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे पालिकेच्या कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष झालं असल्याचा आरोप इथल्या स्थानिक नागरिकांनी केलाय.