
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. मुंबईवर पाणी संकट असून मुंबई महानगर पालिकेने पाण्याच्या वापराबाबत नियमावली जारी केली आहे.
मुंबईतील नवीन बांधकामे, जलतरण तलावांच्या पाणीपुरवठ्यावर मर्यादा आणण्यात आली आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक पाणी वापरात 20 टक्के कपात करण्यात आली. पिण्याच्या पाण्याच्या संरक्षणासाठी महापालिकेकडून अतिरिक्त उपाययोजना लागू करण्यात आली आहे. जर मुंबईकरांनी पाण्याचा गैरवापर केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे.
'अल निनो'मुळे पावसाने ओढ दिल्याने आणि मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट झाल्याने होत आहे.
पाणीसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या अंतर्गत मुंबई महानगरात 15 मे 2026 पासून 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे.
तसेच, पिण्याच्या पाण्याची बचत सुनिश्चित करण्यासाठी पिण्याव्यतिरिक्त इतर वापरावरही 17 जून 2026 पासून आवश्यक मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
मुंबई शहर व उपनगरांसाठी सध्या प्रतिदिन सुमारे 4 हजार 664 दशलक्ष लीटर (MLD) इतकी पाण्याची आवश्यकता आहे. उपलब्ध पर्यायामधून मुंबई महानगराला प्रतिदिन सरासरी 4 हजार 100 दशलक्ष लीटर इतके पाणी पुरविले जाते.
खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाच्या सुचनेनुसार मुंबईत 15 मे 2026 पासून 10 टक्के पाणीकपात लागू केली आहे.
सद्यस्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली असून आज 16 जून 2026 रोजी उपलब्ध पाणी साठा हा 10.35 टक्के इतकाच शिल्लक आहे. पावसाळा लांबल्याने हा पाणीसाठा अधिकाधिक दिवस टिकविण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर आहे. पिण्याच्या पाण्याची बचत करण्याकामी महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबई महानगर पालिकेकडून खालील सूचना जारी -
हेही वाचा
