Advertisement

मुंबईत कोरोनाचे २४४० नवे रुग्ण, ४२ जणांचा दिवसभरात मृत्यू

शुक्रवारी दिवसभरात १३५८ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ७२ हजार ०३६ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे २४४० नवे रुग्ण, ४२ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शुक्रवारी कोरोनाने ४२४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात २४४० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा COVIDचा संसर्ग, मुंबईतील पहिलीच केस

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत शुक्रवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४२ रुग्ण दगावले आहेत. तर २ आँक्टोंबर रोजी ४३ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १ आँक्टोंबर रोजी एकूण ४३ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे २४४० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता २ लाख ९ हजार ९५४ इतकी झाली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात १३५८ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ७२ हजार ०३६ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-प्लाझ्मा बॅगचा दर निश्चित, प्रति बॅग साडेपाच हजार रुपयांना

राज्यात आतापर्यंत ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९१ टक्के आहे. सध्या २ लाख ६० हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज १३ हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले तर १५ हजार ५९१ नविन रुग्णांची नोंद झाली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६९ लाख ६० हजार २०३ नमुन्यांपैकी १४ लाख १६ हजार ५१३ नमुने पॉझिटिव्ह ( २०.३५ टक्के) आले आहेत. राज्यात  २१ लाख  ९४ हजार ३४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २९ हजार ५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४२४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  सांगितले

आज निदान झालेले १५,५९१ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ४२४ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२४४० (४२), ठाणे- २७० (३), ठाणे मनपा-३५८ (२), नवी  मुंबई मनपा-३८८ (७), कल्याण डोंबिवली मनपा-३२१ (१), उल्हासनगर मनपा-४६ (३), भिवंडी निजामपूर मनपा-४७ (२), मीरा भाईंदर मनपा-२४० (१), पालघर-१५९ (४), वसई-विरार मनपा-१४५ (६), रायगड-२६२ (३), पनवेल मनपा-२६१ (), नाशिक-२३९ (१३), नाशिक मनपा-६९२ (११), मालेगाव मनपा-१५, अहमदनगर-५१० (३), अहमदनगर मनपा-११० (१), धुळे-४३ (१), धुळे मनपा-४३ (१), जळगाव-१७५ (४), जळगाव मनपा-१७३ (१), नंदूरबार-३८ (१), पुणे- ८९६ (२०), पुणे मनपा-१०४३ (१८), पिंपरी चिंचवड मनपा-५९९ (८), सोलापूर-२९१ (१५), सोलापूर मनपा-६३ (५), सातारा-७५७ (४२), कोल्हापूर-२४९ (५), कोल्हापूर मनपा-६४ (२), सांगली-३८४ (१५), सांगली  मिरज कुपवाड मनपा-१३९ (५), सिंधुदूर्ग-६७ (४), रत्नागिरी-११६ (४), औरंगाबाद-१२० (०),औरंगाबाद मनपा-२७८ (१), जालना-३५, हिंगोली-३३ (३), परभणी-३९, परभणी मनपा-२७ (१), लातूर-१३७ (४), लातूर मनपा-९४ (२), उस्मानाबाद-१६० (८), बीड-२१३ (४), नांदेड-८० (१), नांदेड मनपा-४९ (२), अकोला-४२ (१), अकोला मनपा-४८, अमरावती-८४, अमरावती मनपा-१२९, यवतमाळ-८१ (५), बुलढाणा-२४६ (१), वाशिम-११०, नागपूर-३५४ (११), नागपूर मनपा-६४६ (१८), वर्धा-१४९ (३), भंडारा-१४६ (७), गोंदिया-९४ (२), चंद्रपूर-१३० (१), चंद्रपूर मनपा-१५४ (३), गडचिरोली-१४३, इतर राज्य-२७ (२).

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा