Advertisement

मुंबईत कोरोनाचे ९३१ नवे रुग्ण, ४९ जणांचा दिवसभरात मृत्यू

मंगळवारी दिवसभरात ८९२ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ५१९३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे ९३१ नवे रुग्ण, ४९ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात सोमवारी कोरोने ४२२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ९३१ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-अरे बापरे ! राज्यात ४२२ जणांचा एका दिवसात कोरोनाने मृत्यू, ११ हजार ११९ नवे रुग्ण

 राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४९ रुग्ण दगावले आहेत. तर १६ आॅगस्ट रोजी ४० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १५ आॅगस्ट रोजी एकूण ४७ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मंगळवारी मुंबईत कोरोनाचे ९३१ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ३० हजार ४१० इतकी झाली आहे. तर मंगळवारी दिवसभरात ८९२ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ५१९३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा

राज्यात आज ९३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण बरे झाले आहेत. आज ११ हजार ११९ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६  हजार ६०८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३२ लाख ६४ हजार ३८४ नमुन्यांपैकी ६ लाख १५ हजार ४७७ नमुने पॉझिटिव्ह (१८.८५ टक्के) आले आहेत. राज्यात ११ लाख ३५ हजार ७४९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार १७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे.

हेही वाचाः- सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची अचानक बदली

आज निदान झालेले ११,११९ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ४२२ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९३१ (४९), ठाणे- १३१ (४), ठाणे मनपा-१६४ (१८), नवी मुंबई मनपा-३५२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-२१२ (१०), उल्हासनगर मनपा-८ (५), भिवंडी निजामपूर मनपा-९ (२), मीरा भाईंदर मनपा-१५१ (२), पालघर-१०९, वसई-विरार मनपा-१५५ (३), रायगड-२५५ (२५), पनवेल मनपा-१६७ (३६), नाशिक-१५६ (११), नाशिक मनपा-५११ (५), मालेगाव मनपा-३२ (१), अहमदनगर-२२० (७),अहमदनगर मनपा-३१५ (१०), धुळे-६० (२), धुळे मनपा-३६ (२), जळगाव-३९९ (१०), जळगाव मनपा-६८ (१), नंदूरबार-३७ (३), पुणे- ४१८ (१६), पुणे मनपा-१२६७ (५४), पिंपरी चिंचवड मनपा-७४७ (१९), सोलापूर-३२८ (११), सोलापूर मनपा-१०८ (२), सातारा-३५३ (११), कोल्हापूर-३३४ (११), कोल्हापूर मनपा-१३७ (५), सांगली-१५४ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५१ (६), सिंधुदूर्ग-४१ (१), रत्नागिरी-१४० (३), औरंगाबाद-११५,औरंगाबाद मनपा-१३१, जालना-६३, हिंगोली-१९ (२), परभणी-४४ (१), परभणी मनपा-५४, लातूर-८१ (३), लातूर मनपा-१०१ (१), उस्मानाबाद-१०२ (४), बीड-११६ (६), नांदेड-१०६ (२), नांदेड मनपा-१५१, अकोला-२ (२), अकोला मनपा-८ (१), अमरावती-५१ (१), अमरावती मनपा-८२ (३), यवतमाळ-७३, बुलढाणा-१०१ (१), वाशिम-२४, नागपूर-१५६ (७), नागपूर मनपा-६५६ (२७), वर्धा-१४, भंडारा-५५, गोंदिया-२४, चंद्रपूर-९ (१), चंद्रपूर मनपा-७ (१), गडचिरोली-११, इतर राज्य ७ (२).

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा