Advertisement

'पारू गो पारू, वेसावची पारू'चा आवाज हरपला; कोळी गाण्यांचा बादशाह काशीराम लक्ष्मण चिंचय यांच निधन

'पारू गो पारू, वेसावची पारू'चा आवाज हरपला; कोळीगीत सातासमुद्रापार नेणारे काशीराम लक्ष्मण चिंचय यांचे निधन झालं.

'पारू गो पारू, वेसावची पारू'चा आवाज हरपला; कोळी गाण्यांचा बादशाह काशीराम लक्ष्मण चिंचय यांच निधन
SHARES

'पारू गो पारू वेसावचे पारू' अशी अनेक कोळीगीत सातासमुद्रापार नेणारे व सुप्रसिद्ध लोकशाही काशीराम लक्ष्मण चिंचय यांचे निधन झालं आहे. शुक्रावरी पहाटे निधन झाले. ते ७१  वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी हेमा, मुलगा सचिन आणि तीन विवाहित कन्या असा परिवार आहे.

शुक्रवारी दुपारी १ वाजता त्यांच्यावर वेसावे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. पारंपारिक कोळी नाच गाण्यांचा बादशाह काशीराम लक्ष्मण चिंचय यांचे पहाटे निधन झाले. गेले काही दिवस आजारी होते. 

लोकमत या वृत्तवाहीनीनं दिलेल्या माहितीनुसार, काशीराम लक्ष्मण चिंचय यांना उपचारासाठी  सुरुवातीला अंधेरी पश्चिम येथील ब्रह्मकुमारी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होते. मात्र, त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं. तेथे उपचार घेत असताना शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

५ दशके कोळी, आगरी पारंपरिक गाण्यांचा ठेका सातासमुद्रापार नेला. जात, धर्म, प्रांत या बाहेर जाऊन त्यांनी निर्माण केलेल्या कोळी संगीताच्या ठेक्यावर सगळ्यांना नाचायला लावले. काशिराम चिंचय यांनी वेसावकर आणि मंडळी या सुप्रसिद्ध कलापथकाद्वारे निर्मित केलेल्या वेसावकरांची कमाल, हिरोंची धमाल या अमिताभ बच्चन आणि काशीराम यांच्या आवाजातील संवाद आजही कोळ्यांची संस्कृती ताजी करतो. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा