Advertisement

दोन कार, एका व्यक्तीला वाहून नेणाऱ्या दहिसर नदीवरील पूलाचा भाग खचला


दोन कार, एका व्यक्तीला वाहून नेणाऱ्या दहिसर नदीवरील पूलाचा भाग खचला
SHARES

बोरीवलीच्या श्रीकृष्ण नगर पुलावरील फूटपाथ खचल्याने या फूटपाथवरून चालणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. २९ आॅगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसात संजय गांधी उद्यानाजवळून वाहणाऱ्या दहिसर नदीत दोन चारचाकी आणि एकजण वाहून गेला होता. याच नदीवर हा पूल आहे. 



दहिसर नदीतील वाढलेली पाण्याची पातळी पाहता खड्डयात पाय अडकून पादचाऱ्यांना जलसमाधी मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे हे फूटपाथ काही दिवसांपूर्वीच दुरुस्त करण्यात आले होते. त्याच ठिकाणचा भाग खचल्याने तेथे खोलवर खड्डा पडला आहे.

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात बोरीवली पूर्वेकडील श्रीकृष्ण नगर येथील पुलावरील फूटपाथचा काही भाग खचल्याची बाब स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आली. स्थानिक रहिवासी तेजस शाह यांनी या ठिकाणाचे व्हिडीओ चित्रीकरण करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हा फूटपाथ त्वरीत दुरुस्त करण्याचे आवाहन केले आहे.

२९ ऑगस्टच्या पुरात या पुलावरून पाणी वाहत होते. त्यानंतर या फूटपाथचा भाग दुरुस्त करण्यात आला होता. तरीही हा दुरुस्त भाग खचल्याचे शाह यांनी स्पष्ट केले आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा