
महाराष्ट्रातील (maharashtra) ठाणे (thane) जिल्ह्यातील मीरा-भाईँदर (bhayandar) शहरात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नारळाचे झाड (coconut tree) अंगावर पडून एका माजी उपमहापौरांच्या 35 वर्षीय मुलाचा मृत्यू (death) झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.
बुधवारी घडलेल्या घटनेनंतर दोन दिवसांनी, मुर्दगावचे रहिवासी आणि मीरा-भयंदर महानगरपालिकेच्या (एमबीएमसी) माजी उपमहापौरांचे पुत्र, पीडित राहुल अशोक पाटील यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी पाटील सदानंद नगर परिसरातून आपल्या मोटारसायकलने जात असताना, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उन्मळून पडलेले नारळाचे झाड त्यांच्या वाहनावर कोसळले.
पाटील गंभीर जखमी झाले होते आणि त्यांना चिंताजनक अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचे निधन झाले, असे सांगण्यात आले.
