कुलाबा - गणेशविसर्जनानंतर कुलाब्यातील भाजवा पार्क समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात कचरा आणि निर्माल्य साचला होता. मात्र या समुद्रकिना-याची पालिकेच्या घनकचरा विभागातर्फे स्वच्छता करण्यात आली आहे. याबाबत मुंबई लाईव्हने वृत्त प्रसारित केलं होतं. तसंच
समुद्रकिनाऱ्यावर ठेवण्यात आलेले निर्माल्य कलशही उचलण्यात आले आहेत. घनकचरा विभागाकडून करण्यात आलेल्या सफाईनंतर संपू्र्ण भादवा किनारपट्टी साफ झाली आहे.