सर्व बांधकाम ठिकाणी प्रदूषण निर्देशकविषयक उपकरण बसवणे खंडपीठाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार, एका महिन्याच्या आत प्रदूषण निर्देशकाशी संबंधित उपकरणे बसवली गेली नाहीत, तर अशा बांधकामांवर आदेशांची पूर्तता होईपर्यंत बांधकाम बंद ठेवण्याची कारवाई करण्याचे आदेश देखील विशेष खंडपीठाने दिले.
मुंबईसह (mumbai) उपनगरातील वायू प्रदूषणाच्या पातळीतवाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानेच स्वत: हून दाखल केली होती.
त्यावर गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीच्या वेळी मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय आणि न्यायमूर्ती कुलकर्णी यांच्या विशेष खंडपीठाने तपशीलवार आदेश दिला होता. त्याची प्रत बुधवारी उपलब्ध झाली. त्यात, विशेष खंडपीठाने राज्य सरकारसह महापालिकांना (bmc) आदेश दिले.
वाहनांमधून होणारे प्रदूषण (pollution) हे हवेची गुणवत्ता बिघडवण्यासाठीचे प्रमुख कारण असल्याचे विशेष खंडपीठाने या सविस्तर आदेशात नमूद केले आहे. तसेच, मुंबई महानगर प्रदेशमधील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी असते. रस्त्यांवरील वाहनांची ही घनता चिंताजनक आहे.
परिणामी, वायू प्रदूषणाशी संबंधित समस्या वाढत आहे. त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना कमी पडत आहेत, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.
त्याचप्रमाणे, यावर तोडगा म्हणून डिझेल (diesel) आणि पेट्रोलवर (petrol) चालणारी वाहने (vehicles) टप्प्याटप्प्याने बंद करणे योग्य किंवा व्यवहार्य आहे का ? याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.
त्यामुळे, राज्य सरकारच्या संबंधित विभागाला तज्ज्ञंची समिती स्थापन करावी आणि या समितीने तीन महिन्यांत अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने (bombay high court) दिले.
हेही वाचा