Advertisement

रुळांवर पाणी साचल्यावरही लोकल सुरुच राहणार

मध्य रेल्वेवरील कुर्ला ते एलटीटी व पश्चिम रेल्वेवरील दादर ते लोअर परळ यादरम्यान विभागांची पाहणी करण्यात आली आहे.

रुळांवर पाणी साचल्यावरही लोकल सुरुच राहणार
SHARES

मुंबईत (mumbai) पावसाळ्यादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचण्याची मोठी समस्या निर्माण होते. लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला (kurla) स्थानकादरम्यानही मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते.

पाणी साचण्याच्या या समस्येवर मध्य रेल्वेकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे. आयआयटी मुंबईने केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने 'एलटीटी' परिसरात पाण्याची भुयारी टाकी उभारण्यात येईल. या टाकीची साठवणक्षमता 10 कोटी लिटर इतकी असणार आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (MRVC) सूचनेनूसार आयआटी मुंबईकडून रेल्वे रुळांवर पाणी भरण्याची ठिकाणे व त्यावरील उपायांबाबत अभ्यास करून शिफारसी सुचवण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेवरील कुर्ला ते एलटीटी व पश्चिम रेल्वेवरील दादर (dadar) ते लोअर परळ (lower parel) यादरम्यान विभागांची पाहणी करण्यात आली आहे. त्यात पूर व्यवस्थापनासाठी प्रभावी व परवडणाऱ्या उपायांसह पाण्याच्या प्रवाहाचे विश्लेषण करण्यात आलं आहे.

याबाबत सविस्तर सर्वेक्षण अहवाल रेल्वे प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) बांधलेल्या पाणी साठवण्याच्या टाकीप्रमाणे कुर्ला-एलटीटी परिसरात 1 लाख 168 घनमीटर क्षमतेची भुयारी टाकी बसवण्याची तयारी सुरू केली आहे.

रेल्वे रुळांवर पावसाळ्यात (rainy season) साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी 56 कोटी रुपयांचा मोठा प्रकल्प हाती घेण्यात येईल.

या प्रकल्पाअंतर्गत भुयारी टाक्या उभारल्या जाणार आहे. तसेच त्यामध्ये पावसाचे पाणी जमा केले जाणार आहे. पाऊस ओसरल्यावर या टाक्यांमधील पाणी पंपांच्या साहाय्याने समुद्रात सोडलं जाईल.

रेल्वे प्रशासनाने या टाक्या उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्याच्या टाक्यांची क्षमता कमी असल्यामुळे हा नवीन प्रकल्प आवश्यक आहे.

कुर्ला ते एलटीटी हा मध्य रेल्वेवरील असा भाग आहे, जिथं मुसळधार पावसाने सर्वाधिक पाणी साचतं. यामुळे रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम होतो.

या समस्येवर मात करण्यासाठीच साचणारे पाणी भुयारी टाक्यांमध्ये जमा केले जाणार आहे. जेव्हा पावसाचा जोर कमी होईल व पाणी ओसरण्यास सुरुवात होईल, तेव्हा उच्च दाबाच्या पंपांचा वापर करून या टाक्यांमधील पाणी समुद्रात सोडण्यात येणार आहे.

वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासन या टाक्या उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.



हेही वाचा

महाराष्ट्र सरकार ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणार

'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' मोहिमेचा तिसरा टप्पा 3 नोव्हेंबरपासून

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा