गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेकडून जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या विभागातील विविध सोसायट्यांकडून पाणी पुरवठा कमी होत असल्याच्या तक्रारी गृहनिर्माण, उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे सातत्याने केल्या जात होत्या. या तक्रांरींची दखल घेऊन शुक्रवारी वायकर यांनी जोगेश्वरी कार्यालयातील अधिकारी आणि रहिवासी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत वायकर यांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महिनाभर विशेष मोहीम हाती घेण्यात यावी, अशी सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.
पाण्याचा प्रश्न कधी सुटणार?
या मोहिमेनंतर पुन्हा एकदा बैठक घेण्यात येईल, असं आश्वासन देखील त्यांनी रहिवाशांना यावेळी दिलं. त्याचप्रमाणं, वेरावली रिझर्व वायरमधील पाण्याची लेव्हल नीट ठेवावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांनी केली. त्यामुळं आता जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील पाण्याचा प्रश्न सुटणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाण्याचं नियोजन करणार
या बैठकीला नगरसेवक प्रविण शिंदे, बाळा नर, रेखा रामवंशी, मुंबई महानगरपालिकेचे जलअभियंता तवाडीया, राठोड, एमएमआरडीएचे अधिकारी तसंच रहिवासी उपस्थित होते. यावेळी मागील वर्षी तलावांमध्ये १४ लाख ३४ हजार इतका पाणीसाठा झाला होता. यंदा १३ लाख १७ हजार इतका पाणीसाठा झाला असल्यानं मुंबईकरांना दरदिवशी सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी १ ऑक्टोबरला जलविभागाकडून पाणी पुरवठयाचं नियोजन करण्यात आलं आहे. तलावांतील पाणी साठ्याचा आढावा घेऊन दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाण्याचं नियोजन करण्यात येणार असल्याचं, जलअभियंता तवाडीया यांनी बैठकीत म्हटलं आहे.
काही महिन्यांपासून एमएमआरडीए, पीपीडायस कंम्पाऊंड, जोगेश्वरी गुंफा, पंपहाऊस, शिवटेकडी, पुनमनगर, वांद्रे प्लॉट, आरे येथील रॉयल पाम, मोराचा पाडा, मयुर नगर, एसआरपी कॅम्पमधील इमारतींना पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रारी नगरसेवक तसेच स्थानिक रहिवाशांनी राज्यमंत्री वायकर यांना केली होती.
जलजोडणीचं काम महिन्याभरात
या तक्रारीनंतर एमएमआरडीएच्या अंतर्गत असलेल्या ७ इमारतींना येत्या आठवडयाभरात पाण्याचं कनेक्शन देण्यात येणार असल्याचं, आश्वासन एमएमआरडीएच्या अधिकार्यांनी दिले आहे. तसंच, पीपीडायस कंम्पाऊंड आणि जोगेश्वरी गुंफा येथील रहिवाशांसाठी नवीन पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण करण्यात आलं असून जलजोडणीचं काम महिन्याभरात पूर्ण करण्यात येणार असल्याचं, आश्वासन देखील महापालिकेच्या अधिकार्यांनी दिलं आहे.
'येथे' अधिकृत कनेक्शन द्या
वांद्रे प्लॉट येथील परिसरात चोरीने पाण्याचं कनेक्शन देण्यात आले आहेत. याबाबत महापालिकेच्या अधिकार्यांनी एक ड्राईव्ह देऊन जे कनेक्शन चोरून दिलेले आहेत, ते तात्काळ तोडून त्या रहिवाशांना अधिकृत कनेक्शन द्यावेत, अशी सूचनाही राज्यमंत्री वायकर यांनी महापालिकेच्या अधिकार्यांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे, आरेतील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात यावी, असं आश्वासनही वायकर यांनी उपस्थित रहिवाशांना दिलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेकडून जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या विभागातील विविध सोसायट्यांकडून पाणी पुरवठा कमी होत असल्याच्या तक्रारी गृहनिर्माण, उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे सातत्याने केल्या जात होत्या. या तक्रांरींची दखल घेऊन शुक्रवारी वायकर यांनी जोगेश्वरी कार्यालयातील अधिकारी आणि रहिवासी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत वायकर यांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महिनाभर विशेष मोहीम हाती घेण्यात यावी, अशी सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.
पाण्याचा प्रश्न कधी सुटणार?
या मोहिमेनंतर पुन्हा एकदा बैठक घेण्यात येईल, असं आश्वासन देखील त्यांनी रहिवाशांना यावेळी दिलं. त्याचप्रमाणं, वेरावली रिझर्व वायरमधील पाण्याची लेव्हल नीट ठेवावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांनी केली. त्यामुळं आता जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील पाण्याचा प्रश्न सुटणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाण्याचं नियोजन करणार
या बैठकीला नगरसेवक प्रविण शिंदे, बाळा नर, रेखा रामवंशी, मुंबई महानगरपालिकेचे जलअभियंता तवाडीया, राठोड, एमएमआरडीएचे अधिकारी तसंच रहिवासी उपस्थित होते. यावेळी मागील वर्षी तलावांमध्ये १४ लाख ३४ हजार इतका पाणीसाठा झाला होता. यंदा १३ लाख १७ हजार इतका पाणीसाठा झाला असल्यानं मुंबईकरांना दरदिवशी सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी १ ऑक्टोबरला जलविभागाकडून पाणी पुरवठयाचं नियोजन करण्यात आलं आहे. तलावांतील पाणी साठ्याचा आढावा घेऊन दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाण्याचं नियोजन करण्यात येणार असल्याचं, जलअभियंता तवाडीया यांनी बैठकीत म्हटलं आहे.
काही महिन्यांपासून एमएमआरडीए, पीपीडायस कंम्पाऊंड, जोगेश्वरी गुंफा, पंपहाऊस, शिवटेकडी, पुनमनगर, वांद्रे प्लॉट, आरे येथील रॉयल पाम, मोराचा पाडा, मयुर नगर, एसआरपी कॅम्पमधील इमारतींना पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रारी नगरसेवक तसेच स्थानिक रहिवाशांनी राज्यमंत्री वायकर यांना केली होती.
जलजोडणीचं काम महिन्याभरात
या तक्रारीनंतर एमएमआरडीएच्या अंतर्गत असलेल्या ७ इमारतींना येत्या आठवडयाभरात पाण्याचं कनेक्शन देण्यात येणार असल्याचं, आश्वासन एमएमआरडीएच्या अधिकार्यांनी दिले आहे. तसंच, पीपीडायस कंम्पाऊंड आणि जोगेश्वरी गुंफा येथील रहिवाशांसाठी नवीन पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण करण्यात आलं असून जलजोडणीचं काम महिन्याभरात पूर्ण करण्यात येणार असल्याचं, आश्वासन देखील महापालिकेच्या अधिकार्यांनी दिलं आहे.
'येथे' अधिकृत कनेक्शन द्या
वांद्रे प्लॉट येथील परिसरात चोरीने पाण्याचं कनेक्शन देण्यात आले आहेत. याबाबत महापालिकेच्या अधिकार्यांनी एक ड्राईव्ह देऊन जे कनेक्शन चोरून दिलेले आहेत, ते तात्काळ तोडून त्या रहिवाशांना अधिकृत कनेक्शन द्यावेत, अशी सूचनाही राज्यमंत्री वायकर यांनी महापालिकेच्या अधिकार्यांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे, आरेतील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात यावी, असं आश्वासनही वायकर यांनी उपस्थित रहिवाशांना दिलं आहे.