Advertisement

मुंबईत गारठा वाढला! पुढील दहा दिवस थंडीचे, IMD चा इशारा

राज्यात पुढील १० ते १२ दिवस थंडीचे असतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मुंबईत गारठा वाढला! पुढील दहा दिवस थंडीचे, IMD चा इशारा
SHARES

राज्यात थंडीचा बोचरेपणा जाणवत असून, अनेक ठिकाणी या मोसमामध्ये पहिल्यांदाच १० अंशांच्या खाली किमान तापमानाची नोंद झाली.

मुंबईमध्येही किमान तापमान २० अंशांच्या खाली नोंदले गेले असून, राज्यात पुढील १० ते १२ दिवस थंडीचे असतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. यात २३ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत किंचित तापमान वाढही होऊ शकते. सध्या ईशान्य दिशेकडून वाऱ्यांचा प्रभाव जाणवत असल्याने तापमानात घट आहे.

मुंबईतही रविवारी कुलाबा येथे कमाल तापमान सरासरीपेक्षा १.८ तर सांताक्रूझ येथे १.६ ने कमी होते. कुलाबा येथे ३१.६ आणि सांताक्रूझ येथे ३२.१ नोंदले गेले. दोन्ही केंद्रांवर शनिवारच्या तुलनेत एका अंशांची घसरण झाली आहे.

रविवारी सकाळी किमान तापमान १९.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही सांताक्रूझ येथे किमान तापमान १९.६ अंश नोंदले गेले होते.

तर कुलाबा येथे रविवारी २२.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबई शहरामध्ये अजून गारठ्याची जाणीव फारशी झालेली नाही. २२ ते २६ नोव्हेंबर या काळात २२ ते २३ अंशांदरम्यान किमान तापमान असण्याचा अंदाज आहे.

उर्वरित महाराष्ट्रात मात्र किमान तापमानाचा पारा थंडीची जाणीव करून देणारा राहील, असा अंदाज आहे.

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईच्या माध्यमातून विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी शीतलहरीचा स्थानिकांना अनुभव येऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रासाठी तापमानासंदर्भात कोणताही इशारा नाही.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्येही १० ते १२ अंशांदरम्यान तसेच काही ठिकाणी १४ ते १६ अंशांदरम्यानही किमान तापमानाची नोंद होऊ शकते. २७ नोव्हेंबरपासून थंडीच्या मोसमातील तिसऱ्या आवर्तनाला सुरुवात होईल, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा