Advertisement

सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात रविवारपासून नाईट कर्फ्यू लागू

राज्यात रविवार २८ मार्च २०२१ रात्रीपासून नाईट कर्फ्यू अर्थात जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात रविवारपासून नाईट कर्फ्यू लागू
SHARES

सातत्याने आवाहन करण्यात येऊनही कोरोनाबाबतच्या (coronavirus) नियमांचं काटेकोरपणे पालन होत नसल्याने तसंच सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी होत नसल्याने अखेर राज्यात रविवार २८ मार्च २०२१ रात्रीपासून नाईट कर्फ्यू अर्थात जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. जनतेनेही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावं, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचं ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  यासंबंधीचे स्वतंत्र आदेश ताबडतोब मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित करण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणून घेतल्या, त्यावेळी ते बोलत होते.  

लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण…

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही, परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेड्स व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावं. 

हेही वाचा- लोकलची गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के उपस्थितीचा बीएमसीचा आदेश

धोका टळला नाही, उलट वाढला

ब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊननंतर (lockdown) आता हळुहळु पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होताना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेनेही लक्षात घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथं आवश्यकता असेल, तर जरूर लॉकडाऊन लावा. पण ते लावताना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा, अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

सूचनांचं पालन करा

उद्धव ठाकरे पुढं म्हणाले की, आपण बेड्स, आरोग्य सुविधा वाढवू. परंतु डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार, हे लक्षात घेतलं पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसंच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचं पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी.

तसंच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावं, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

हेही वाचा- “होळी, रंगपंचमीला गर्दी नको, नियमांचं पालन करा”

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा