महापालिका मुख्यालयातील सुरक्षा रक्षकांवर उपसुरक्षा अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या अन्यायकारक वर्तणुकीबद्दल स्थायी समिती सदस्यांनी तीव्र चिड व्यक्त केली आहे. सुरक्षा रक्षकांना जाणीवपूर्वक बदनाम करून त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या या उपसुरक्षा अधिकाऱ्याला सेवेतून निलंबित करण्याची मागणी समिती सदस्यांनी केली आहे. मात्र, त्याचबरोबरच महिला सुरक्षा रक्षकांना मुख्यालयात रात्रीची सेवा (थर्ड शिप)बजावणे बंधनकारक केले होते. तशाप्रकारची रात्र सेवा यापुढे महिला सुरक्षा रक्षकांना दिली जावू नये, असंही स्थायी समितीने म्हटलं आहे. त्यामुळे पुढील बैठकीत याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.
'सुडबुद्घीने अन्याय'
शिक्षण समिती अध्यक्ष शिवसेना नगरसेवक मंगेश सातमकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका मुख्यालयातील सुरक्षा रक्षकांवर अन्याय होत असून उपसुरक्षा रक्षक अभय चौबळ हे सुडबुद्घीने त्यांच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाजी मंडईतून मासे घरपोच होत नसल्याने चौबळे सुरक्षा रक्षकांवर सुड उगवत असल्याचाही आरोप सातमकर यांनी केला. त्यामुळे सर्व जुन्या सुरक्षा रक्षकांना सुडबुद्धीने खोट्या पत्राच्या आधारे त्यांच्या बदल्या केल्या आहेत. सुरक्षा रक्षकांच्या बदल्या या व्हायलाच हव्यात. पण त्या प्रचलित धोरणानुसार व्हाव्यात. परंतु चौबळ यांनी केवळ या सुरक्षा रक्षकांना त्रास देण्यासाठी असे वागत असून जर अशाप्रकारे दादागिरी करून एखादा अधिकारी वागत असेल तर त्यांची दादागिरी उतरवायला हवी, असं त्यांनी सांगितलं.
मग याला जबाबदार कोण?
मुख्यालयात महिला सुरक्षा रक्षकांना रात्री सेवा बजावण्यास भाग पाडलं जातं. मात्र त्यावेळी मुख्यालयात कुणीही नसतं. मग त्या महिला सुरक्षा रक्षकांसोबत काही घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत महिलांची रात्रीची सेवा त्वरीत बंद केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी केली.
विशाखा राऊत म्हणाल्या...
सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी आजारी महिला सुरक्षा कर्मचाऱ्याला रात्रीची सेवा जाणीव पूर्वक या अधिकाऱ्याने दिली होती. पण आपण बोलल्यानंतर तिची रात्रीची सेवा बंद केली. खुद्द अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी याप्रकरणी सकारात्मक पाऊल घेतल्यामुळे या विभागातील महिलांची रात्र सेवा तुर्तास थांबली असली तरी यापुढे मुख्यालयात महिला सुरक्षा रक्षकांना रात्रीची सेवा दिलीच जावू नये, असं त्यांनी सांगितलं.
अशा अधिकाऱ्याला त्वरीत निलंबित
मुख्यालयात जे जुने सुरक्षा कर्मचारी आहेत, ते नगरसेवकांना ओळखत असतात. त्यामुळे त्यांना तिथून त्वरीत हटवणे योग्य नसून ज्यांना सेवानिवृत्तीला एक ते दोन वर्षे आहे, त्यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यामुळे अशाप्रकारे अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्याला त्वरीत निलंबित केले जावे, अशी मागणी त्यांनी केली.
महापालिका मुख्यालयातील सुरक्षा रक्षकांवर उपसुरक्षा अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या अन्यायकारक वर्तणुकीबद्दल स्थायी समिती सदस्यांनी तीव्र चिड व्यक्त केली आहे. सुरक्षा रक्षकांना जाणीवपूर्वक बदनाम करून त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या या उपसुरक्षा अधिकाऱ्याला सेवेतून निलंबित करण्याची मागणी समिती सदस्यांनी केली आहे. मात्र, त्याचबरोबरच महिला सुरक्षा रक्षकांना मुख्यालयात रात्रीची सेवा (थर्ड शिप)बजावणे बंधनकारक केले होते. तशाप्रकारची रात्र सेवा यापुढे महिला सुरक्षा रक्षकांना दिली जावू नये, असंही स्थायी समितीने म्हटलं आहे. त्यामुळे पुढील बैठकीत याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.
'सुडबुद्घीने अन्याय'
शिक्षण समिती अध्यक्ष शिवसेना नगरसेवक मंगेश सातमकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका मुख्यालयातील सुरक्षा रक्षकांवर अन्याय होत असून उपसुरक्षा रक्षक अभय चौबळ हे सुडबुद्घीने त्यांच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाजी मंडईतून मासे घरपोच होत नसल्याने चौबळे सुरक्षा रक्षकांवर सुड उगवत असल्याचाही आरोप सातमकर यांनी केला. त्यामुळे सर्व जुन्या सुरक्षा रक्षकांना सुडबुद्धीने खोट्या पत्राच्या आधारे त्यांच्या बदल्या केल्या आहेत. सुरक्षा रक्षकांच्या बदल्या या व्हायलाच हव्यात. पण त्या प्रचलित धोरणानुसार व्हाव्यात. परंतु चौबळ यांनी केवळ या सुरक्षा रक्षकांना त्रास देण्यासाठी असे वागत असून जर अशाप्रकारे दादागिरी करून एखादा अधिकारी वागत असेल तर त्यांची दादागिरी उतरवायला हवी, असं त्यांनी सांगितलं.
मग याला जबाबदार कोण?
मुख्यालयात महिला सुरक्षा रक्षकांना रात्री सेवा बजावण्यास भाग पाडलं जातं. मात्र त्यावेळी मुख्यालयात कुणीही नसतं. मग त्या महिला सुरक्षा रक्षकांसोबत काही घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत महिलांची रात्रीची सेवा त्वरीत बंद केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी केली.
विशाखा राऊत म्हणाल्या...
सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी आजारी महिला सुरक्षा कर्मचाऱ्याला रात्रीची सेवा जाणीव पूर्वक या अधिकाऱ्याने दिली होती. पण आपण बोलल्यानंतर तिची रात्रीची सेवा बंद केली. खुद्द अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी याप्रकरणी सकारात्मक पाऊल घेतल्यामुळे या विभागातील महिलांची रात्र सेवा तुर्तास थांबली असली तरी यापुढे मुख्यालयात महिला सुरक्षा रक्षकांना रात्रीची सेवा दिलीच जावू नये, असं त्यांनी सांगितलं.
अशा अधिकाऱ्याला त्वरीत निलंबित
मुख्यालयात जे जुने सुरक्षा कर्मचारी आहेत, ते नगरसेवकांना ओळखत असतात. त्यामुळे त्यांना तिथून त्वरीत हटवणे योग्य नसून ज्यांना सेवानिवृत्तीला एक ते दोन वर्षे आहे, त्यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यामुळे अशाप्रकारे अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्याला त्वरीत निलंबित केले जावे, अशी मागणी त्यांनी केली.