Advertisement

निसर्ग चक्रीवादळासाठी नौदल सज्ज, 5 बचाव पथकासह, 3 डायव्हिंग पथकं तयार


निसर्ग चक्रीवादळासाठी नौदल सज्ज, 5 बचाव पथकासह, 3 डायव्हिंग पथकं तयार
SHARES
मुंबईसह कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ घोंघावण्याची शक्यता असल्याने या वादळाला तोंड देण्यासाठी नौदल सज्ज झाले आहे. अत्याधुनिक बोटीसह विविध पथके तैनात करण्यात आल्याची माहिती नौदल अधिका-याने दिली. याशिवाय मुंबईत पोलिसांनी संचारबंदीचे आदेश जारी केले असून त्या अंतर्गत समुद्रकिनारी परिसरात जाण्यात प्रतिबंध करण्यात आला आहे.

नौदलाने अरबी समुद्रात नौका तैनात ठेवल्या आहेत. मुंबईत गिरगाव, वर्सोवा, दादर, जुहू, आक्सा आणि गोराई या मुंबीतील सहा प्रमुख चौपाट्या आहेत. बुधवारी चक्रीवादळ मुंबईत धडकणार असल्याने या सहाही चौपाट्यांवर अग्निशमन दलाने 93 जीवरक्षक आणि 150 पूर नियंत्रक टीमच्या सदस्याना तैनात ठेवले आहे. तसेच या सहाही चौपाट्यांवर नौदलाने पाच बचाव पथके अणि तीन ड्रायव्हींग बोटीं तैनात केल्या आहेत. नैसर्गिक संकटापासून बचावासाठीच्या सर्व गोष्टी तैनात केल्या आहेत. तसेच पुढील तीन दिवस कुणालाही चौपाट्यांकडे फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याबाबत पोलिसांनी कलम 144 अंतर्गत परिपत्रक जारी केले आहे. वादळाच्या पाश्र्वभूमीवर नौदलाच्या पश्चिम कमांडमधील सर्व महत्त्वाच्या नौका अरबी समुद्रात किनारपट्टी भागात तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सुटका करण्यासाठीची सर्व साधनेही सज्ज ठेवण्यात आली आहे.


अरबी समुद्रात आणि लक्षद्वीप बेटांच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे चक्रीवादळ तयार झालं आहे. निसर्ग असं या चक्रीवादळाला नाव देण्यात आले आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप बेटांच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. या क्षेत्रातील वातावरण पुढील २४ तासात बिघडण्याची चिन्ह आहे. यातून चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आलेल्या या वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या आप्तकालीन परिस्थितीत  नागरिकांना वाचवण्यात NDRF च्या पथकाने मोठी भूमिका बजावली होती.  त्याच पार्श्वभूमिवर मुंबईसह कोकण किनार पट्टीत आता NDRF ची 9 पथक तैनात करण्यात आली होती.  माञ वादळाची वेग मर्यादा लक्षात घेऊन प्रशासनाने महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीला लागून असलेल्या जिल्हयांमध्ये NDRF च्या 45 तुकड्या तैनात केलेल्या आहेत. महाराष्ट्रातून 21 तुकड्यांचा समावेश आहे. त्यातील 5 या विशाखापट्टणम येथून विशेष विमानाने मंगळवारी राञी बोलवल्या आहेत. या 20 तुकड्यांमध्ये 2 टिम पालघर, 2 ठाणे, 3 मुंबई, 4 रायगड, 1 रत्नागिरी, 1 सिंधूदुर्ग, 1 नवीमुंबईत तैनाक केलेल्या आहेत. तर गुजरात राज्याला ही या चक्रीवादळाचा फटका बसणार असल्यामुळे त्या ठिकाणी 18 पथकं पाठवण्यात आलेली आहे. तर दिव-दमण येथे 2 पथक तैनात करण्यात आलेली आहे. तसेच निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, गोवा, केरळा, कर्नाटका या किनारपट्टीवरील मच्छीमारांना समुद्रात उतरण्यास मनाई केली आहे.  

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा