Advertisement

लक्ष द्या! शुक्रवारी ठाण्यातील 'या' भागात पाणीपुरवठा बंद

पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल

लक्ष द्या! शुक्रवारी ठाण्यातील 'या' भागात पाणीपुरवठा बंद
SHARES

ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा आणि वागळे (काही भाग) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणाची सध्याची साठवण क्षमता लक्षात घेता आणि पाटबंधारे विभागाने पाणी नियोजनासाठी दिलेल्या निर्देशानुसार शुक्रवार, 2 जून दुपारी 12.00 ते 3 जून दुपारी 12.00 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा होणार नाही. या कालावधीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणीपुरवठा योजनेंतर्गत नव्याने टाकलेल्या बारवी वाहिन्या सुरू करण्याचे तातडीचे काम हाती घेतले आहे.

सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व भागात, दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक २६ आणि ३१ चा भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती, रुपादेवी पाडा, वागळे प्रभागातील किसान नगर क्रमांक २ मध्ये पाणीपुरवठा होणार नाही. मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत समिती, नेहरूनगर व कोलशेत खालचा गाव 24 तास पाणीपुरवठा बंद असेल. 

पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. या पाणीकपातीच्या काळात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.



हेही वाचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! पालिकेकडून 120 सोसाट्यांवर गुन्हे दाखल

रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज बदलणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा