डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांनी बाबासाहेबांना चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. यावेळी 'इंदू मिल येथे बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला महिनाभरात सुरुवात होईल, त्यासाठी टेंडर निघालं आहे' अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
डाॅ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
Our tributes to the epitome of knowledge, Father of Indian Constitution BharatRatna Dr Babasaheb Ambedkar on #MahaparinirwanDin !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) 6 December 2017
भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्ञानाचा अफाट सागर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली ! pic.twitter.com/5bqhUYxd52
Paid tributes to Dr. Ambedkar this morning. pic.twitter.com/K4RABtZ90l
— Narendra Modi (@narendramodi) 6 December 2017
ओखी वादळामुळे मंगळवारी मुंबईत जोरदार पाऊस झाल्याने शिवाजी पार्कच्या मैदानावर सर्वत्र चिखल साचला. त्यामुळे प्रशासनाने आंबेडकरी अनुयायांची राहण्याची व्यवस्था दादर परिसरातील ७० शाळांमध्ये केली आहे. येथे अनुयायांसाठी मोफत औषधोपचाराची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच बेस्टने जादा बसगाड्या देखील सोडल्या आहेत.