मुंबई नागपूर प्रवास आता लवकरच होणार आहे. यापूर्वी याच प्रवासाला 17 ते 18 तास लागायचे. तर ट्रेनने हा प्रवास 12 तासांचा आहे, आणि आता हा प्रवास महामार्गाने सुसाट झाला आहे. कारण समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे मुंबई नाशिक 2 तासांवर आला तर मुंबई नागपूरचा प्रवास हा 8 तासांत पोहोचता येणार आहे.
सहापदरी समृद्धी महामार्ग 120 रुंदीचा हा मार्ग नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गावापासून ते ठाणे जिल्ह्यातील आमने गाव यांना जोडणार आहे. या महामार्गामुळे 10 जिल्हे, 26 तालुके आणि जवळपास 392 गाव जोडली गेली आहे. तर महामार्गा लागून 19 कृषी समृद्धी केंद्रांची आहेत. भविष्यात महामार्गाच्या दोन्ही बाजूने सुमारे 11 लाख 31 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
तर या महामार्गाचा वेग ताशी 150 किमी इतका आहे. तर वेगावर मर्यादा ठेवण्यासाठी प्रत्येकी पाच किमी अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याशिवाय तुमची गाडी महामार्गावर प्रवेश केल्यावर वेळ नोंदवली जाईल.
पण तुम्ही समृद्धीवरून किती वाजता बाहेर पडलात यांची नोंद घेतली जाते. या नोंदच्यानुसार तुम्ही ताशी किती वेगाने गाडी चालवली याचा अंदाज घेऊन मशिन वेग मर्यादा तोडल्यास तुम्ही पकडल्या जाता.
या महामार्गावर 65 उड्डाणपूल, 33 मोठं पूल, 274 छोटे पूल, 8 रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, 25 इंटरचेंजेस, 6 बोगदे, 189 भूयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 110 भूयारी मार्ग, पाळीव प्राणी आणि पादचाऱ्यांसाठी 209 भूयारी मार्ग, वन्यजीवांसाठी 3 भूयारी मार्ग आणि 3 उन्नत मार्ग आहे.
नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग 10 जिल्हे जोडले गेले आहेत. तर या महामार्गामुळे ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद , जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर ही शहरं जोडली गेली आहे.
हेही वाचा