चेंबूर - पालिकेकडून दीड वर्षांपूर्वीच चेंबूरच्या चरई स्मशानभूमीत डागडुजी करण्यात आली होती. तेव्हा पेव्हर ब्लॉकही नव्यानं बसवण्यात आले होते. सध्या हे पेव्हर ब्लॉक चांगल्या स्थितीत असतानाही पालिकेकडून ते काढून नवे पेव्हर ब्लॉक टाकण्याचं काम सुरू आहे. यासाठी पालिका लाखो रुपयांचा निधी वाया घालवत असल्याचा आरोप स्थानिक निशांत पवार यांनी केला आहे. या संदर्भात लवकरच महापालिका आयुक्तांशी पत्रव्यवहार करणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं.