Advertisement

मुंबईत थंडीचा फेरा आणखी आठवडाभर!


मुंबईत थंडीचा फेरा आणखी आठवडाभर!
SHARES

गेल्या तीन दिवसांपासून मराठवाडा, विदर्भात गारपिटीसह अवकाळी पावसाने थैमान घातल्याने राज्यातील हवामानात कमालिचा बदल झाला आहे. हा बदल मुंबईतही जाणवू लागला असून मुंबईकरांना दुपारी गार वाऱ्यांसह रात्री थंडीचा अनुभव मिळत आहे.

मुंबईकरांना सकाळी थंडी, दुपारी काही प्रमाणात ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी हवेतील गारव्याचा अनुभव येत आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे आणखी आठवडाभर मुंबईकरांना असाच अनुभवता येणार आहे. कुलाबा वेधशाळे (आयएमडी)च्या नोंदीनुसार सोमवारी कमाल २९.० अंश, तर किमान १७.० अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं.



एवढंच नव्हे, तर सध्या कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा दीडपट खाली येण्याची शक्यता असल्याचं मुंबई हवामान विभागाचे संचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे.

'आयएमडी'च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवडाभर म्हणजेच १८ फेब्रुवारीपर्यंत किमान तापमान सरासरी १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तर, कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असू शकतं. त्यामुळे पुढचा आठवडाभर मुंबईकरांना आल्हाददायक गारवा अनुभवता येईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा