गेल्या दोन दिवसांत टोमॅटोच्या भावात मोठी वाढ झाली आहे. शेतकर्यांकडून टोमॅटो (Tomato Rate) महाग होत आहेत, त्यामुळेच त्यांच्या भावात (Market Rates)मोठी वाढ झाल्याचे मंडईतील व्यापारी सांगतात.
तथापि, कृषी तज्ज्ञांच्या मते, उच्च तापमान, कमी उत्पादन आणि देशातील बहुतांश भागात झालेला उशीर झालेला पाऊस टोमॅटोच्या किमती वाढण्यामागे आहे.
एक महिन्यापूर्वी टोमॅटोचा भाव 25 ते 30 रुपये किलो होता. पण अचानक त्याची किंमत आठवडाभरापासून वाढू लागली आणि गेल्या दोन दिवसांत ती थेट 40 वरून 100 पर्यंत वाढली.
बाजारात सध्या राज्यातूनच टोमॅटोची (Tomato) आवक होत आहे. बंगळुरुवरुन येणारा माल पूर्णत: बंद करण्यात आलाय. आतापर्यंत बाजारात ४० ते ५० वाहने भरून टोमॅटो आणला जात होता. मात्र सध्या चित्र उलटले आहे. एपीएमसी बाजारात आवक ५० टक्के आहे. मात्र येथे फक्त २० ते २५ वाहनं भरुन टोमॅटो येत आहे.
टोमॅटोचे दर अचानक वाढल्याने ग्राहकांसह रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना त्याचे नुकसान सोसावे लागत आहे.
मार्केटमध्ये टोमॅटोच्या वीस किलोच्या जाळीला 700 रुपये पर्यंत पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे काय भावाने विक्री करायची असा प्रश्न त्यांना पडला आहे. टोमॅटोचे भाव हे स्थिर व्हायला हवे जेणेकरून याचा फायदा शेतकरी, किरकोळ विक्रेते तसेच ग्राहकाला देखील होईल असे विक्रेत्यानी सांगितले.
एप्रिल अखेरीस टोमॅटोचे दर कोसळले त्यामुळे टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या पेठ, दिंडोरी निफाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उभे पिक तोडून टाकले होते, त्यातच जे उरले होते त्यांनाही अवकाळी पाऊस व वाढत्या उष्णतेचा फटका बसल्याने उत्पादन घटले आहे.