आषाढी एकादशी निमित्त मुंबईतील वडाळा येथील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी नित्यनेमाने भाविक मोठी गर्दी करतात. यापार्श्वभूमीवर येथील रस्ता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या ठिकाणी अनेक क्षेत्रे 'नो एंट्री' झोन करण्यात आले आहे. त्यामुळे येथून प्रवास करता येणार नाही.
मुंबईत येथे 'नो एन्ट्री' झोन घोषित
आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या समाप्तीनंतर भाविक त्यांच्या संबंधित ठिकाणी परत जातील. मात्रा, आषाढी यात्रे निमित्ताने हे नवीन वाहतूक नियम 30 जूनपर्यंत लागू राहतील, अशी माहिती वाहतूक डीसीपी प्रज्ञा जेडगे यांनी दिली आहे.
हेही वाचा