Advertisement

केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर ट्विटरकडून ५०० अकाऊंट्स बंद

ट्विटर नियमांच्या उल्लंघनाचा ठपका ठेवत ५०० हून अधिक खाती निलंबित केली गेली आहेत.

केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर ट्विटरकडून ५०० अकाऊंट्स बंद
SHARES

ट्विटरनं बुधवारी ५०० युजर्सवर कारवाई केली आहे. या अंतर्गत त्यांनी ५०० भारतीय खाती कायमची निलंबित केली आहेत. ट्विटर नियमांच्या उल्लंघनाचा ठपका ठेवत ५०० हून अधिक खाती निलंबित केली गेली आहेत. याशिवाय भारत सरकारनं द्वेष पसरवणारी खाती निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.  

या अकाऊंट्समागे खलिस्तान समर्थक आणि पाकिस्तानचा हात असल्याचं सरकारनं म्हटलं होतं. यासोबतच सरकारनं म्हटलं होतं की, ही अकाऊंट्स शेतकरी चळवळीच्या नावाखाली चुकीची माहिती पसरवतात आणि भडकाऊ पोस्ट करत आहेत.

भारत सरकारच्या आदेशानंतर ट्विटरनं आज एक निवेदन जारी केलं की, यातील काही अकाऊंट्स त्यांनी बंद केली आहेत. ट्विटरनं २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दलही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ट्विटरवर असं म्हटलं होतं की, २६ जानेवारी रोजी दिल्लीतील हिंसाचारानंतर नियमांचे उल्लंघन करणारी आणि सामाजिक सलोखा बिघडवणारा मजकूर काढून टाकण्यात आला आहे. यासह ५०० अकाऊंट्स कायमची बंद करण्यात आली आहेत.

#ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगशी संबंधित सर्व मजकूर हटवण्याचे आदेश केंद्र सरकारनं ट्विटरला दिले होते. केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन केलं नाही तर कडक कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा देखील केंद्र सरकारनं ट्विटरला दिला होता. या संदर्भात सरकारनं नोटिस देखील बजावली होती.

३० जानेवारीला #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगचा वापर करणाऱ्या सर्व अकाऊंटवर ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आदेशाचे पालन करण्यात न आल्याने सरकारने नाराजी व्यक्त केली. सरकारच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक असून तसे न केल्यास कडक दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्र सरकारनं नोटिसीत दिला आहे.



हेही वाचा

टेलिग्राम ठरले सर्वाधिक डाऊनलोड होणारे अॅप

क्रेडिट कार्डने भरता येणार घराचं भाडं, पेटीएमकडून सुविधा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा