मुंबईतील अनेक दुर्मिळ आणि जुनी झाडे ही रस्त्यांचं बांधकाम आणि काँक्रीटीकरणामुळे पावसाळ्यात उन्मळून पडतात. शिवाय झाडांच्या मुळांना खोलवर पसरण्यास मार्ग नसल्याने ही झाडे कमकुवत बनतात. त्यामुळे या झाडांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येक झाडांभोवतील दोन फुट अंतरावर संरक्षक कठडे बनवण्याची मागणी आता नगरसेवकांकडून केली जात आहे.
म्हणून झाडांचं जतन आवश्यक
जुन्या आणि दुर्मिळ झाडांचं अस्तित्व टिकून राहावं म्हणून झाडांचं जतन, सुरक्षितता आणि मुंबईच्या सौंदर्यात वाढ होण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा आणि मध्यभागी असलेल्या झाडांच्या बुंध्याजवळ चहुबाजुंनी दोन फूट खोल खणून त्यामध्ये माती टाकून संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीत केली आहे.
मग झाडं पडण्याचं प्रमाण घटेल
अशाप्रकारे झाडांना आधार मिळाल्याने झाडं उन्मळून पडण्याचं प्रमाण कमी होऊन मनुष्य आणि वित्तहानी टळेल आणि झाडांच्या मुळांना मातीमधून पोषक खत मिळून झाडांची योग्यप्रकारे देखभालही होईल, असं यशवंत जाधव यांनी म्हटलं आहे.
काँक्रिटीकरणाचा झाडांवर विपरित परिणाम
मुंबईत रस्त्यांच्या दोन्ही बाजुंना, मध्यभागी दुर्मिळ आणि सुंदर अशी विविध जातींची झाडे आहेत. परंतु, मुंबईचं झपाट्याने झालेलं शहरीकरण आणि निर्माण झालेल्या काँक्रिटीकरणाचा विपरित परिणाम या जुन्या दुर्मिळ झाडांवर होत असलेला दिसून येतो. त्यामुळे अशाप्रकारच्या दुर्मिळ आणि झाडांचं अस्तित्व धोक्यात येवून त्यांचा ऱ्हास होण्याची शक्यता आहे. यातील बरीच झाडे ही धोकादायक स्थितीत असल्याने ती पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे कोसळून मनुष्य तसेच मालमत्तेची हानी होण्याचीही दाट शक्यता नाकारता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबईतील अनेक दुर्मिळ आणि जुनी झाडे ही रस्त्यांचं बांधकाम आणि काँक्रीटीकरणामुळे पावसाळ्यात उन्मळून पडतात. शिवाय झाडांच्या मुळांना खोलवर पसरण्यास मार्ग नसल्याने ही झाडे कमकुवत बनतात. त्यामुळे या झाडांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येक झाडांभोवतील दोन फुट अंतरावर संरक्षक कठडे बनवण्याची मागणी आता नगरसेवकांकडून केली जात आहे.
म्हणून झाडांचं जतन आवश्यक
जुन्या आणि दुर्मिळ झाडांचं अस्तित्व टिकून राहावं म्हणून झाडांचं जतन, सुरक्षितता आणि मुंबईच्या सौंदर्यात वाढ होण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा आणि मध्यभागी असलेल्या झाडांच्या बुंध्याजवळ चहुबाजुंनी दोन फूट खोल खणून त्यामध्ये माती टाकून संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीत केली आहे.
मग झाडं पडण्याचं प्रमाण घटेल
अशाप्रकारे झाडांना आधार मिळाल्याने झाडं उन्मळून पडण्याचं प्रमाण कमी होऊन मनुष्य आणि वित्तहानी टळेल आणि झाडांच्या मुळांना मातीमधून पोषक खत मिळून झाडांची योग्यप्रकारे देखभालही होईल, असं यशवंत जाधव यांनी म्हटलं आहे.
काँक्रिटीकरणाचा झाडांवर विपरित परिणाम
मुंबईत रस्त्यांच्या दोन्ही बाजुंना, मध्यभागी दुर्मिळ आणि सुंदर अशी विविध जातींची झाडे आहेत. परंतु, मुंबईचं झपाट्याने झालेलं शहरीकरण आणि निर्माण झालेल्या काँक्रिटीकरणाचा विपरित परिणाम या जुन्या दुर्मिळ झाडांवर होत असलेला दिसून येतो. त्यामुळे अशाप्रकारच्या दुर्मिळ आणि झाडांचं अस्तित्व धोक्यात येवून त्यांचा ऱ्हास होण्याची शक्यता आहे. यातील बरीच झाडे ही धोकादायक स्थितीत असल्याने ती पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे कोसळून मनुष्य तसेच मालमत्तेची हानी होण्याचीही दाट शक्यता नाकारता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं.