मुंबईतील २ तरूण मुलांचा लोणावळा परिसरातील पवना डॅममध्ये बुडून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. अमय दिलीप राहते (२५), तेजस रवी फांगम (२२) अशी मृत मुलांची नावं असून, रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पवना डॅममध्ये उतरल्यानंतर या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडाले, अशी माहिती समोर येत आहे.
अमेय राहते, तेजस फांगम, साई प्रसाद मिस्त्री हे आणखी एका मित्रासह लोणावळा परिसरात फिरण्यासाठी आले होते. हे तिघंही मुंबईतील काळा चौकी परिसरात राहणारे आहेत. स्वतःची कार घेऊन आलेले हे मित्र पवना डॅम इथं गेले होते. पवना डॅमवर आल्यानंतर त्यांची मस्ती सुरू झाली. त्याचवेळी अमेय आणि तेजस हे दोघं डॅममधील पाण्यात उतरले. पण, पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघेही बुडायला लागले.
त्यावेळी त्यांच्या २ मित्रांनी म्हणजे साई प्रसाद आणि सोबतच्या मित्रानं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. यामध्ये अमेय आणि तेजस यांचा बुडून मृत्यु झाला. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेची माहिती लोणावळा पोलिसांना संध्याकाळी मिळाली. याप्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असून, दोन्ही मयत तरुणांना पोहता येत नव्हतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा -
मुंबईमध्ये घरात चक्क गांजाची लागवड
मुंबईकरांसाठी अंधेरीत मशीनमध्ये कपडे धुण्याची 'सुविधा’