मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी तलावानंतर आता विहार तलावही भरला आहे. मुंबईत गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तुळशी तलावापाठोपाठ आता विहार तलाव भरला आहे.(Vihar Talav which supplies water to Mumbai overflows)
मुंबईकरण्णा पानीसपरी कर्ण-या 7 तलावत विहार तलाव आज (26 जुलै 2023) मध्यरात्री 00.48 मिनिटांनी भरून ओसंडून वाहू लगा आहे, असं ट्विट करत पालिकेने ही माहिती दिली.
हेही वाचा :
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी विहार तलाव आज (२६ जुलै २०२३) मध्यरात्री ००.४८ मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे.#BMC #BmcUpdates pic.twitter.com/ngw6QjQTuw
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 26, 2023
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलैच्या मध्यरात्री 00.48 वाजता विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे.
तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण बुधवारी पहाटे तुडुंब भरून वाहू लागलं आहे. त्यामुळं तानसा धरणातून 1100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तानसा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि भिवंडी, तर पालघर जिल्ह्यातील वाडा आणि वसई तालुक्यातील गावांचा समावेश आहे. तानसा धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी नदीपात्रातून जाताना काळजी घ्यावी. तसंच महसूल आणि पोलीस प्रशासनानं दक्ष राहावं, अशी सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आल्या आहेत.
सध्या १० टक्के पाणीकपात आहे
मुंबईत सध्या १० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास ही पाणीकपात मागे घेतली जाणार का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा