भारतीय क्रिकेट संघातील मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणेनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. हे आभार मानण्यामागचं कारण म्हणजे मोदी यांनी अजिंक्यला पत्र लिहून 'स्वच्छता ही सेवा' या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे.
या पत्राला उत्तर देताना अजिंक्यने आदरणीय नरेंद्र मोदी तुमचं पत्र मिळाल्याने मी फारच आनंदी झालो आहे. या अभियानात सहभागी होणे ही माझ्यासाठी सन्मानजनक बाब आहे, असं उत्तर मोदी यांना दिलं आहे.
Respected @narendramodi ji. I'm truly humbled to receive this letter from you. It's my honour to participate in SWACHHATA HI SEVA movement. pic.twitter.com/cIvbzr4jTN
— ajinkyarahane88 (@ajinkyarahane88) September 22, 2017
या आधीही २ ऑक्टोबर २०१६ रोजी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने 'स्वच्छ भारत' अभियानत भाग घेऊन कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमची स्वच्छता केली होती. 'स्वच्छता ही सेवा' हे अभियान देशभरात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.
हेही वाचा -
मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 10 नोव्हेंबरला
राजा भाईंचं माझ्या करियरमध्ये मोठं योगदान - सचिन तेंडुलकर
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)