Advertisement

२०२१ चा टी-२० वर्ल्ड कप भारतात

२०२१ सालचा टी-२० वर्ल्ड कप ठरल्याप्रमाणे भारतातच होणार आहे. तर २०२२ सालचा टी-२० वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात होईल.

२०२१ चा टी-२० वर्ल्ड कप भारतात
SHARES

कोरोना संकटामुळे अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, आता भारतातील क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आयसीसीने २०२१ आणि २०२२ सालच्या टी-२० वर्ल्ड कपची घोषणा केली आहे. २०२१ सालचा टी-२० वर्ल्ड कप ठरल्याप्रमाणे भारतातच होणार आहे. तर २०२२ सालचा टी-२० वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात होईल.



शुक्रवारी आयसीसीची महत्वाची बैठक झाली आणि यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पुढील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये भारतात टी-२० वर्ल्डकप खेळवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मागील टी-२० वर्ल्डकप २० झाला होता. त्यानंतर २०२० मध्ये ही स्पर्धा होणार होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा यंदा होऊ शकणार नाही. यंदाच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप रद्द करण्यात आला होता. 


याशिवाय २०२३ साली एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक भारतामध्ये होणार आहे. दुसरीकडे न्यूझीलंडमध्ये ६ फेब्रुवारी २०२१ ते ७ मार्च २०२१ दरम्यान होणारा महिलांचा ५० ओव्हरचा वर्ल्ड कपही २०२२ सालापर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. 


कोरोना व्हायरसमुळे भारतात मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली. अखेर ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप रद्द झाल्यामुळे आयपीएल युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीमध्ये आयपीएल स्पर्धा रंगणार आहे. 




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा