वडिलांसोबत झालेल्या भांडणामुळं १४ वर्षीय मुलाने वाशीच्या खाडीत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तो वडाळा येथील अॅण्टॉप हिल परिसरात राहत होता. १९जूलै रोजी या मुलाचं त्याच्या वडिलांशी काही कारणांमुळं भांडणं झालं होतं. त्यामुळं त्यानं वाशीच्या खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याचं समजतं आहे.
मिळालेल्या माहितीमुसार, वडाळ्यात राहणारा हा मुलगा नेरुळ येथील अपेज्जी शाळेत शिकत होता. १९ जूलैला तो शाळेत गेला होता. मात्र, शाळा सुटल्यानंतर तो घरी न परतल्यामुळं त्याच्या वडिलांनी नेरुळ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान, २४ जुलैला वाशी खाडीच्या काठावर स्थानिकांना एका तरुणाचा मृतदेह सापडला. त्यावेळी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून देण्यासाठी मुलाच्या वडिलांना घटनास्थळी बोलावलं होतं. शाळेच्या गणेवशावरून त्या मुलाची ओळख पटली.
हेही वाचा -
दुकानांवर दरोडा टाकणाऱ्या सराईत आरोपींना अटक
भांडुपमध्ये कॉलेजमध्ये घुसून विद्यार्थ्याची हत्या