बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या


बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या
SHARES

गोवंडी - कामधंदा नसल्याने निराश झालेल्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी गोवंडीच्या टाटानगर परिसरात घडली आहे. हरेश तायडे (31) असे या तरुणाचे नाव असून, तो याठिकाणी पत्नी आणि ५ वर्षांच्या मुलासह राहत होता. 

गेल्या अनेक महिन्यांपासून या तरुणाला नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तो निराश होता. दरम्यान गुरुवारी सकाळी घरात कोणीच नसताना त्याने दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळानंतर पत्नीला ही बाब समजल्यानंतर तिने तत्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत देवनार पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा