मुंबई - सरकार दरबारी किती घोटाळे होतात हे सांगायची गरज नाही. लाच घेतल्याशिवाय सरकारी कार्यालयात कोणतीही कामे होत नाही. मग अशावेळी सामन्यांकडे न्याय मिळवण्याचा एकच मार्ग उरतो.तो म्हणेजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेण्याचा. मात्र आकडेवारीवर नजर टाकल्यास तुम्हाला धक्काच बसेल. गेल्या अडीच वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्याकडे आलेल्या ४,६०३ तक्रारी संबंधीत विभागाकडेच वर्ग केल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. त्यामुळे एसीबी आपल्या कामात ढकलाढकली तर करत नाहीये असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.