महाराष्ट्र एटीएसला आंध्रप्रदेश सरकारकडून ८ लाखांचं बक्षीस

मागील अनेक वर्षांपासून आंध्र प्रदेशात घातपाती कारवाया करणाऱ्या ७ माओवाद्यांवर तेथील सरकारने आठ लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. हे माओवादी मुंबईतील पूर्व उपनगरात लपून बसल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती.

महाराष्ट्र एटीएसला आंध्रप्रदेश सरकारकडून ८ लाखांचं बक्षीस
SHARES

 राज्यांतील काही जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला असताना या नक्षलवाद्यांवर कारवाईसाठी स्थानिक पोलिस ठाण्यांबरोबरच महाराष्ट्र एटीएसने पुढाकार घेतला आहे. अनेक नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळून महाराष्ट्र एटीएसने दमदार कामगिरी बजावली आहे. अशात आंध्र प्रदेश येथे मोस्ट वाॅन्टेड असलेल्या ७ माओवाद्यांना पकडल्याप्रकरणी आंध्रप्रदेश सरकारने  या माओवाद्यांवर असलेली बक्षिसाची रक्कम महाराष्ट्र एटीएसला देण्याचं जाहीर केलं आहे.

मागील अनेक वर्षांपासून आंध्र प्रदेशात घातपाती कारवाया करणाऱ्या ७ माओवाद्यांवर तेथील सरकारने आठ लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.  हे माओवादी मुंबईतील पूर्व उपनगरात लपून बसल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. त्यानुसार महाराष्ट्र एटीएसचे पोलिस उपायुक्त मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील वडके, पोलिस निरीक्षक संजय मराठे, भास्कर कदम यांच्यासह पथकातील पोलिसांनी सापळा रचून या ७ माओवाद्यांना अटक केली होती. अटक माओवाद्यांमध्ये माओवादी नेता कृष्णा लिंगैय्या घोषका उर्फ वेणुगोपालन याचाही समावेश होता.

वेणुगोपालनवर आंध्रप्रदेशमध्ये २०१२ पासून ८ लाखांचं बक्षीस सरकारने जाहीर केलं होतं.  मुंबईत राहून हे माओवादी गुजरात आणि महाराष्ट्रातील माओवादी विचारधारणेतील तरुणांना एकत्र करून माओवादी संघटनांचा प्रचार आणि प्रसार वाढवण्याचे काम करत होते. माओवादी नेता वेणुगोपालन व्यतिरिक्त एटीएसने सत्य नारायन कर्रेल्ला, बाबू वांगुरी, शंकरय्या गुंडे, रवि मारमपेल्ली, रमेश गोलाला, नरसय्या जुम्पाला आणि सैदुल सिंगपंगा यांनाही अटक केली होती.



हेही वाचा -

२ शिक्षकांचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न, सुदैवाने अडकले सुरक्षा जाळीत

दुप्पट पैशाचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा