राज्यात लॉक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी तीन लाख 10 हजार 694 पास पोलिस विभागामार्फत देण्यात आले.तर लाँकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर
राज्यात 96 हजार गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे 22 मार्च ते 6 मे या कालावधीत कलम 188 नुसार 96 हजार 231 गुन्हे नोंद झाले असून 18 हजार 858 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 3कोटी 56 लाख 81हजार994 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलिस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.
या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 189 घटना घडल्या. त्यात 663 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.नियंत्रण कक्षाला 85 हजार हजार दूरध्वनी पोलीस विभागाचा 100 क्रमांकावर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लाँकडाऊन च्या काळात क्रमांकावर 85 हजार 309 दूरध्वनी आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर विलगीकरणाचा असा शिक्का आहे अशा 649 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.
राज्यात एकूण दोन लाख 24 हजार 219 व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले अशी माहिती देशमुख यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1281 वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले व 53 हजार 330 वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
पोलिस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 3, पुणे 1, सोलापूर शहर 1 अशा 5 पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. 43पोलीस अधिकारी व 444 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
रिलिफ कँम्प
राज्यात एकूण चार हजार 738 हजार रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास चार लाख 35 हजार 030 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.