पालघर जिल्ह्यात जमावानं तीन प्रवाशांना चोर समजून दगडानं ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हल्ल्यात सामील असलेल्या १०१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे गुरुवारी 16 एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली होती.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात चोर फिरत असल्याची अफवा मोठ्या प्रमाणावर पसरली होती. त्यामुळे येथीन लोक धस्तावले होते. अशातच गुरूवारी रात्री दाभाडी-खानवेल मार्गावरून तिघे मारुती इको गाडीतून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप दिला. यावेळी या तिघांनी जीव वाचवण्यासाठी गयावया करत पळण्याचा प्रयत्नही केला. मात्र, चोरांचं भूत डोक्यात घुसलेल्या या ग्रामस्थांनी काहीही न ऐकता या तिघांनाही जीव जाईपर्यंत मारलं.
पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 19, 2020
मुंबईहून सूरतला निघालेल्या तीघांची पालघर येथील हत्येची
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 19, 2020
राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन हल्ल्यात सामील १०१ जणांची अटक केली गेली आहे व उच्च स्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. कुणीही या घटनेचं विवाद करुन सामाजिक/जातीय तेढ निर्माण करत नाही यावरही सरकार लक्ष ठेऊन आहे.#LawAndOrderAboveAll