मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे राज्य सरकारने नेमलेल्या उच्चाधिकार समितीने राज्यभरातील ५० टक्के कैदी आणि कच्च्या कैद्यांची तात्पुरती सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 17 हजार 500 कैदी आणि कच्च्या कैद्यांना दिलासा मिळणार आहे.
तुरुंगांमधील गर्दी कमी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने २३ मार्च रोजी दिले होते. त्यामुळे राज्य सरकारने निकष निश्चित करण्यासाठी उच्चाधिकार समिती नेमली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमजद सय्यद, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) संजय चहांदे आणि पोलिस महासंचालक (कारागृह) एस. एन. पांडे यांचा समावेश असलेल्या या उच्चाधिकार समितीने सध्याची एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन सोमवारच्या बैठकीतकैद्यांची तात्पुरती सुटका करण्याचा निर्णय घेतला.राज्यातील सर्व तुरुंगांमध्ये ३५ हजार २०० कैदी व कच्चे कैदी आहेत. त्यापैकी ५० टक्के कैदी/ कच्च्या कैद्यांची तात्पुरती सुटका करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. आतापर्यंत पाच हजारहून अधिक जणांची अंतरिम जामिनावर तर सहाशे जणांची पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. १२ हजार कैदी व कच्च्या कैद्यांचीही येत्या काही दिवसांत सुटका होणार आहे.
हेही वाचा -