नवीन कैद्यांसाठी 'हे' पाच कारागृहात आजपासून बंद, कारागृह प्रशासनाचा निर्णय


नवीन कैद्यांसाठी 'हे' पाच कारागृहात आजपासून बंद, कारागृह प्रशासनाचा निर्णय
SHARES

करोनाचे संकट दिवसेंदिवस  वाढत असताना, कारागृह प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील आर्थररोड भायखळा, ठाणे, कल्याण, येरवडा,  कारागृह कैद्यांसाठी लाँकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे या तुरूंगात आता नवीन कैद्यांना प्रवेश बंदी असणार आहे. राज्य कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी आज ही घोषणा केली.

राज्यातील कारागृहांतील क्षमतेच्या तुलनेत त्यात कैद्यांची संख्या दुप्पट आहे. म्हणूनच कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन न्यायालयाने 7 वर्ष शिक्षा असलेल्या 11 हजार कैद्यांना 45 दिवसांच्या जामीनावर सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहण केल्यानंतर सर्व कारागृहात सामाजीक अंतर (सोशल डीस्टसिंग) ची अंमलबजावणी पहील्या दिवसांपासुन सुरू असल्याचे रामानंद यांनी सांगीतले.


करोना विषाणु चा संसर्ग रोखण्याकरीता राज्यातील सर्व कारागृहात प्रबोधन केले जात आहे तसेच एक चित्रफीत सुद्धा दाखवण्यात येत आहे. यामुळे बंद्यांमध्ये मोठी जागरुता निर्माण होउन, बंद्यांचे आरोग्य व्यवस्थीत ठेवण्याकरीता येथील डाॅक्टर व सर्व कर्मचारी प्रयत्न करत असल्याचे रामानंद यांनी सांगीतले.

देशातील वाढत असलेला करोना संसर्ग पाहुन, आज पासुन काही महत्वाच्या कारागृहात पुर्ण लाॅकडाउन करण्यात येत आहे, कारण नवीन येणाऱ्या कैद्यास याची लागन झाली असल्यास आत मध्ये असलेल्या बंद्यांना धोका निर्माण होउ शकतो, म्हणुन लाॅकडाउन चा निर्णय घेण्यात आला आहे. रामानंद यांच्या नुसार या कारागृहात आजपासुन कोणताही नवीन बंदी घेतला जाणार नाही, पोलीसांनी नजीकच्या कारागृहात बंद्यांना पाठवयाचे असल्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे. 




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा