Advertisement

'लॉ'च्या विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश, अनेक विद्यार्थी चिंताग्रस्त

लॉच्या तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी यादीत नाव जाहीर झालेले काही विद्यार्थी प्रवेशासाठी कॉलेजमध्ये गेले असता, त्यांना प्रवेश नाकरण्यात आलं. याबाबत विद्यार्थ्यांनी आवाज उठवल्यानंतर त्यांना तात्पुरत्या कालावधीसाठी प्रवेश देण्यात आला असला तरी तो कोणत्याही क्षणी काढून घेतला जाऊ शकतो.

'लॉ'च्या विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश, अनेक विद्यार्थी चिंताग्रस्त
SHARES

गेल्या काही दिवसांपासून 'लॉ'चं अभ्यासक्रम विविध कारणामुळे चर्चेत आहे. याच लॉच्या तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी यादीत नाव जाहीर झालेले काही विद्यार्थी प्रवेशासाठी कॉलेजमध्ये गेले असता, त्यांना प्रवेश नाकरण्यात आलं. याबाबत विद्यार्थ्यांनी आवाज उठवल्यानंतर त्यांना तात्पुरत्या कालावधीसाठी प्रवेश देण्यात आला असला तरी तो कोणत्याही क्षणी काढून घेतला जाऊ शकतो, यामुळे अनेक विद्यार्थी चिंताग्रस्त असून एनवेळी प्रवेश काढून घेतल्यास आम्ही जायचं कुठे? असा सवाल विद्यार्थ्यांनी सीईटी सेलला केला आहे.

IMG-20180910-WA0089.jpg

नेमक प्रकरण काय?

यंदा तीन वर्षे लॉ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) च्या माध्यमातून होत असल्यानं यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार ४ सप्टेंबर रोजी प्रवेशाची पहिली यादी जाहीर करण्यात आली.

IMG-20180910-WA0092.jpg

ही यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना देण्यात आलेल्या कॉलेजांत संपर्क साधला. त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची शहानिशा करण्यात आली तेव्हा विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जांत आणि प्रत्यक्ष गुणपत्रिकेवरील गुणांत तफावत आढळून आली. यामुळे कॉलेजांनी प्रवेश नाकारला.
विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे धाव घेतली असता विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करताना आधीच्या सहा सत्रांचे गुण भरताना गडबड केल्याचं निदर्शनास आलं. यानंतर विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकेचा आधार देत त्यानुसार गुण भरल्याच सांगितलं. माहिती पुस्तिकेत गुण कसे भरावे? याबाबात कोणतेही स्पष्टीकरण नसल्याने हा घोळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

IMG-20180910-WA0091.jpg

एवढ्यासाठी प्रवेश नाकारला

इतकंच नव्हे, तर एका विद्यार्थिनीची दहावी आणि बारावी मुंबई विद्यापीठातुन झाली असून केवळ पदवी परदेशातून झाल्यानं तिला प्रवेश नाकरण्यात आलं. विशेष म्हणजे माहिती पुस्तकात दोन्ही ठिकाणी वेगवेगळी माहिती होती. त्यातील एक मुद्द्याद्वारे तिने हा अर्ज केला. याबाबत तिने अनेकवेळा सीईटी सेलच्या हेल्पलाइनवर संपर्क केला असता कोणीही फोन उचलला नाही असा आरोपही तिने केला. त्याशिवाय अनेकवेळा मेल करूनही त्यांनी उत्तर दिलं नाही. असंही तिने सांगितलं आहे. विशेष म्हणजे ही अडचण केवळ मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत दिसून आली आहे.

IMG-20180910-WA0094.jpg

विद्यार्थी आक्रमक

याबाबत विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर तिन्ही याद्या जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना वाट पाहण्यास सूचित करण्यात आलं. याला विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केल्यामुळे त्यांना तात्पुरते प्रवेश देण्यात आले. मात्र हे प्रवेश भविष्यात कोणत्याही क्षणी काढून घेतले जाऊ शकतात, असे विद्यार्थ्यांकडून लिहून घेण्यात आले आहे.

IMG-20180910-WA0093.jpg

सीईटी सेलने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी द्यावी, अशी मागणी युवा सेनेतर्फे करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याबाबत मागणी केली जाणार आहे.
- प्रदीप सावंत, सिनेट सदस्य, युवसेना

IMG-20180910-WA0090.jpg

विद्यार्थ्यांनी गुण भरताना काही चुका केल्या. यात गुण भरल्यानंतर त्याचे एकत्रीकरण करून अंतिम गुण काढले जातात आणि त्याआधारे प्रवेश दिले जातात. हे गुण भरण्यात चुका झाल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीही चुकली. अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. या आता वरिष्ठ पातळीवर सादर केल्या जाणार असून याबाबत काय निर्णय होईल ते जाहीर केले जाईल.
- डॉ. आनंद रायते, संचालक, राज्य सीईटी सेल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा