राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यास युवासेनेसह काही विद्यार्थी संघटनांनी विरोध केल्यानंतर राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने अंतिम वर्षांच्या परीक्षा ‘ऐच्छिक’ करण्याचा पर्याय विद्यापीठांना दिला. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने परीक्षा न घेता विद्यापीठे वेगळे मार्ग शोधत आहेत.
आयसीटीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा बुधवारपासून सुरू झाल्या. ऑनलाइन किंवा ई-मेलच्या माध्यमातून या परीक्षा घेण्यात येत आहेत. पुस्तकाचा आधार घेऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची आहे. अपवादात्मक स्थितीत एखाद्या हाताने उत्तरे लिहून छायाचित्र पाठवल्यास तेही ग्राह्य धरण्यात येणार आहे.
या परीक्षा घेण्यास युवासेनेने विरोध केला. तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी ‘शासन निर्णया’नुसार परीक्षा घेण्याचे आदेश विद्यापीठाला दिले आहेत. शासनाने अंतिम विद्यार्थ्यांसाठी परीक्षा ‘ऐच्छिक’ केल्या आहेत. या निर्णयानंतर शासनाने कोणतेही नवे आदेश दिलेले नाहीत.
या निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या संमतीने परीक्षा घेण्यात येऊ शकते. विद्यापीठ अनुदान आयोगानेही परीक्षांबाबत अद्याप अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचे नियमन करणाऱ्या विविध शिखर परिषदांनीही अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही.
हेही वाचा -
अतिरेक्यांची ताज हॉटेलला धमकी, कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Coronavirus Cases : मुंबईत कोरोनाचे १३११ नवे रुग्ण, दिवसभरात १५१ जणांचा बळी