महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या एसएससी (दहावी) बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. दहावी बोर्डाचे अर्ज भरण्यासाठी १६ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
बारावीप्रमाणे यंदा दहावीच्या परीक्षेचे अर्ज सरल पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येत असून राज्यातून दरवर्षी लाखो विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस अर्ज करतात. त्यानुसार यंदाही दहावीच्या नियमित पुर्नपरीक्षार्थी, श्रेणीसुधार अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचं आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आलं आहे.
दरवर्षीप्रमाणं यंदाही १ मार्चपासून इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरूवात होणार असून या परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कासह www.mahahsscboard.maharashtra.gov.inकिंवा www.mahahsscboard.in या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे.
याआधी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र काही विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास अडचणी येत असल्याने मंडळाकडून अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. यंदा दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च २०१९ या दरम्यान घेण्यात येणार असून बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ दरम्यान होणार आहे.
हेही वाचा-
पीएचडी प्रवेश परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाईन
बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ