वारंवार झालेली आंदोलनं, आश्वासनं, विविध मागण्या आणि शालेय शिक्षण विभागाचा वेळकाढूपणा याच्या निषेधार्थ राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी 2 फेब्रुवारीला महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना बसण्याची शक्यता आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मान्य मागण्यांच्या अंमलबजावणी आणि पुर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे राज्यात पाच टप्प्यात आंदोलन करण्यात आले. आता चौथ्या टप्प्यात २ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद करून सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर आणि मुंबईत आझाद मैदान येथे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी सांगितले.