Advertisement

'तिसऱ्या मुंबई'ला राज्य सरकारची मंजुरी, असे असेल हायटेक शहर

या भागाला तिसरी मुंबई म्हणून सुद्धा ओळखले जाणार आहे.

'तिसऱ्या मुंबई'ला राज्य सरकारची मंजुरी, असे असेल हायटेक शहर
Representative photo
SHARES

नवी मुंबई विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात 'तिसरी मुंबई' (Tisari Mumbai) नावाचे नवे शहर उभारण्यास महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. हे शहर अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूद्वारे (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) मुंबईशी जोडले जाईल असं हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे. 

तिसरी मुंबई म्हणून उदयास येणाऱ्या पनवेल, उरण तालुक्यातील 23 गावांमध्ये सिडको 12 हजार कोटी रूपये खर्च करून रस्ते उभारणार आहे.

नैना क्षेत्र असलेल्या या 23 गावांचा झपाट्याने विकास व्हावा यासाठी सिडकोने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून त्याला मान्यता मिळाल्यानंतर आता त्याचे टेंडर काढण्यात येणार आहे. 

नैना क्षेत्रातील 1 ते 12 असे सर्वच टीपीएस योजनेतील रस्त्यांचे जाळे उभारणीसाठी मार्गातील सर्व अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.

रस्ते बांधताना कुठेही सिग्नल यंत्रणा किंवा चौक येऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे. त्यामुळे रस्ते सरळ रेषेत असतील आणि ज्या ठिकाणी गरज आहे तिथे उड्डाणपूल किंवा अंडरपास बनवला जाणार आहे. यामुळे चौक आणि सिग्नल विरहित आधुनिक डिझाईनचे रस्ते सिडको तयार करणार आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतीपथावर आहे. विमानतळाच्या पुर्वेला असलेल्या पनवेल, उरण तालुक्यातील 23 गावांचा विकास सिडको नैना योजनेअंतर्गत करणार आहे. या भागाला तिसरी मुंबई म्हणून सुद्धा ओळखले जाणार आहे.

रायगड जिल्ह्यातील पेण, खालापूर, कर्जत परिसरात सिडको नैना योजनेतून भविष्यात विकास करणार आहे. पहिल्या टप्यात फक्त पनवेल आणि उरण तालुक्यातील 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे. 



हेही वाचा

SRA घरांची विक्री आता 5 वर्षांनंतर करता येणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा