'राज्यातील एसएससी, आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचं आहे', अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. २४ जून रोजी राज्यातील प्रमुख साहित्यिक मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करावी यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. याबाबत शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी शिकवणं बंधनकारक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
'सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या काही शाळा याचं पालन करत नाहीत, हे माझ्या लक्षात आलं आहे. यासाठी कायद्यात बदल करुन अतिशय कठोर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात मराठी शिकणं हे सगळ्यांसाठी बंधनकारक राहिल. कुठल्याही बोर्डाच्या शाळांना मराठी शिकवावं लागेल, यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल केले जातील', असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि ‘मराठीच्या भल्यासाठी’या मंचाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक मराठी भाषेकडं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी २४ जूनला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.
हेही वाचा -
मुक्ता-ललितच्या जगण्याचा 'श्वास'
क्रितीचा 'पटियाला' अंदाज पाहिला का?