मुंबई विद्यापिठाच्या नव्या कुलगुरुंच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यापीठाला लवकरच नवे कुलगुरु मिळणार यात शंका नाही. काही दिवसांपूर्वीच शोध समितीने अंतिम ५ नावे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे दिली होती. दरम्यान येत्या १९ तारखेला ही मुलाखत पार पडणार असून या पाच व्यक्ती कोण? याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात होती.
अंतिम ५ नावे उघड
सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार, डॉ.प्रमोद येवले (नागपूर विद्यापीठ), डॉ. सुहास पेडणेकर (रुईया कॉलेज), डॉ. विलास सकपाळ (अमरावती विद्यापीठ), डॉ. शरद कोडेंकर (जबलपूर विद्यापीठ) आणि डॉ. अनिल कर्णिक (मुंबई विद्यापीठ) या व्यक्तींची नावे अंतिम ५ मध्ये दाखल झल्याचं बोललं जात आहे.
उलटसुलट नावाच्या चर्चा
मुंबई विद्यापीठात निकाल गोंधळामुळे तत्कालीन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून दूर करण्यात आलं होतं. त्यानंतर नवीन कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीने एक जाहिरातीद्वारे कुलगुरूपदासाठी अर्ज मागवले होते. त्यानंतर कुलगुरूंच्या पदासाठी इच्छुक असलेले अर्ज या समितीकडे पाठवले असून जवळपास १५० ते २०० जणांचे अर्ज या पदासाठी आले होते.
या समितीने त्या सर्व अर्जांपैकी फक्त ३२ जणांची निवड करून शुक्रवार १३ एप्रिल आणि शनिवार १४ एप्रिल या दोन दिवशी नरिमन पॉइंट येथील सिडको भवन येथे ३२ जणांच्या मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं. या सर्व मुलाखती पार पडल्यानंतर शनिवारी १४ एप्रिलला अंतिम ५ नावे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठवण्यात आली. ही नावे राजभवनात पाटवल्यानंतर कोणाची नावं या अंतिम ५ मध्ये असेल याबाबत उलटसुलट चर्चाही विद्यापीठच्या फोर्ट आणि कलिना कॅम्पसमध्ये रंगल्या होत्या. या पदासाठी विद्यापीठातील अनेक विभागप्रमुख आणि इतरांनीदेखील या पदासाठी अर्ज केले असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान सध्याचे प्रभारी कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडेच हा कारभार दिला जाण्याची शक्यता असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यानं त्यांच्याही नावाची चर्चा सुरू होती.
१९ एप्रिलला घोषणा होणार?
ज्या अंतिम ५ जणांची निवड करण्यात आली आहे, ते ५ जण गुरुवारी सादरीकरण करणार असून १९ एप्रिलला अंतिम नावाची घोषणा होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. या ५ जणांमध्ये कोणाचा समावेश आहे, याची अधिकृत माहिती अद्याप राजभवनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.
मुंबई विद्यापिठाच्या नव्या कुलगुरुंच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यापीठाला लवकरच नवे कुलगुरु मिळणार यात शंका नाही. काही दिवसांपूर्वीच शोध समितीने अंतिम ५ नावे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे दिली होती. दरम्यान येत्या १९ तारखेला ही मुलाखत पार पडणार असून या पाच व्यक्ती कोण? याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात होती.
अंतिम ५ नावे उघड
सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार, डॉ.प्रमोद येवले (नागपूर विद्यापीठ), डॉ. सुहास पेडणेकर (रुईया कॉलेज), डॉ. विलास सकपाळ (अमरावती विद्यापीठ), डॉ. शरद कोडेंकर (जबलपूर विद्यापीठ) आणि डॉ. अनिल कर्णिक (मुंबई विद्यापीठ) या व्यक्तींची नावे अंतिम ५ मध्ये दाखल झल्याचं बोललं जात आहे.
उलटसुलट नावाच्या चर्चा
मुंबई विद्यापीठात निकाल गोंधळामुळे तत्कालीन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून दूर करण्यात आलं होतं. त्यानंतर नवीन कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीने एक जाहिरातीद्वारे कुलगुरूपदासाठी अर्ज मागवले होते. त्यानंतर कुलगुरूंच्या पदासाठी इच्छुक असलेले अर्ज या समितीकडे पाठवले असून जवळपास १५० ते २०० जणांचे अर्ज या पदासाठी आले होते.
या समितीने त्या सर्व अर्जांपैकी फक्त ३२ जणांची निवड करून शुक्रवार १३ एप्रिल आणि शनिवार १४ एप्रिल या दोन दिवशी नरिमन पॉइंट येथील सिडको भवन येथे ३२ जणांच्या मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं. या सर्व मुलाखती पार पडल्यानंतर शनिवारी १४ एप्रिलला अंतिम ५ नावे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठवण्यात आली. ही नावे राजभवनात पाटवल्यानंतर कोणाची नावं या अंतिम ५ मध्ये असेल याबाबत उलटसुलट चर्चाही विद्यापीठच्या फोर्ट आणि कलिना कॅम्पसमध्ये रंगल्या होत्या. या पदासाठी विद्यापीठातील अनेक विभागप्रमुख आणि इतरांनीदेखील या पदासाठी अर्ज केले असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान सध्याचे प्रभारी कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडेच हा कारभार दिला जाण्याची शक्यता असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यानं त्यांच्याही नावाची चर्चा सुरू होती.
१९ एप्रिलला घोषणा होणार?
ज्या अंतिम ५ जणांची निवड करण्यात आली आहे, ते ५ जण गुरुवारी सादरीकरण करणार असून १९ एप्रिलला अंतिम नावाची घोषणा होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. या ५ जणांमध्ये कोणाचा समावेश आहे, याची अधिकृत माहिती अद्याप राजभवनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.
हेही वाचा -
कुलगुरूंची निवड १९ तारखेला?