Advertisement

राज्यात ८० हजार शाळा बंद करण्याचा कुठलाही विचार नाही- तावडे


राज्यात ८० हजार शाळा बंद करण्याचा कुठलाही विचार नाही- तावडे
SHARES

येत्या १५ वर्षांत राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याचा सरकारचा कोणताही उद्देश नसून या सर्व अफवा आहेत. त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं स्पष्टीकरण राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी ट्विटरवरून दिलं आहे .


अफवांवर विश्वास ठेवू नका

येत्या १५ वर्षांत राज्यातील ८० हजार सरकारी शाळा बंद करून ही संख्या ३० हजारांवर आणण्याचा शिक्षण विभागाचा कुठलाही विचार नाही, असं मत शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवाने व्यक्त केलं नसल्याचा दावाही त्यांनी केला. शाळा बंद करण्याचं सरकारचं कोणतंही धोरण नाही, असं सांगत या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं.



काय म्हणाले होते प्रधान सचिव?

शिक्षण विभागातील अधिकारी, केंद्र प्रमुखांच्या बैठकीसाठी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार रविवारी औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी सरकारी शाळांबाबतच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारची आगामी वाटचाल स्पष्ट करताना राज्यातील ८० हजार सरकारी शाळा बंद करून ही संख्या ३० हजारांवर आणण्याचं शिक्षण विभागाने उद्दिष्ट ठेवले आहे, असं मत व्यक्त केलं होतं. त्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने तावडे यांनी टि्वट करून हा खुलासा केला आहे.

यावर खुद्द शिक्षण सचिवांनीही या बातम्या खोट्या असून हा राजकीय डाव असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.


शासनाचं असं कोणतंही धोरण नसून त्यात सत्यता नाही. शिक्षण विभागाचा असा कोणताही प्रस्ताव सध्या नाही. लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

- नंदकुमार, शिक्षण सचिव

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा