Advertisement

लॉ च्या नव्या परीक्षांविरोधात विद्यार्थी कोर्टात; १९ ऑक्टोबरला सुनावणी

नव्या पद्घतीनुसार लॉ शाखेत आता ६० गुणांच्या परीक्षेत १८ गुण मिळवणं बंधनकारक ठरणार असून ४० गुणांच्या परीक्षेत १२ गुणांची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लॉ शाखेच्या परीक्षेत उत्तीर्णतेच्या नियमातही बदल झाला आहे.

लॉ च्या नव्या परीक्षांविरोधात विद्यार्थी कोर्टात; १९ ऑक्टोबरला सुनावणी
SHARES

 मुंबई विद्यापीठानं यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लॉ अभ्यासक्रमाच्या परीक्षा पद्धतीत बदल करून ६०/४० हा नवा पॅटर्न सुरू केला आहे. या पॅटर्नला अनेक विद्यार्थी संघटना कडाडून विरोध दर्शवत असूनही या परीक्षा पद्धतीवर विद्यापीठ प्रशासन मात्र ठाम आहे. यामुळं विरोधात स्टुंडट लॉ काऊन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ९ ऑक्टोबरला ही याचिका दाखल करण्यात आली असून येत्या १९ ऑक्टोबरला यावर सुनावणी होणार आहे.


उत्तीर्णतेच्या नियमातही बदल

केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगानुसार मुंबई विद्यापीठानं श्रेयांक श्रेणी पध्दत सुरू केली आहे. या पद्धतीत गेल्या अनेक वर्षांपासून बऱ्याच वेळा बदल करण्यात आला असून काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा या पद्धतीत बदल करण्यात येत असल्याचं परीपत्रक मुंबई विद्यापीठानं जाहीर केलं होतं. या परीपत्रकानुसार आता परीक्षेत ६०/४० ही पध्दत वापरण्यात येणार असून लॉ शाखेमध्ये ही पध्दत सुरू करण्यात आली आहे. या नव्या पद्घतीनुसार लॉ शाखेत आता ६० गुणांच्या परीक्षेत १८ गुण मिळवणं बंधनकारक ठरणार असून ४० गुणांच्या परीक्षेत १२ गुणांची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लॉ शाखेच्या परीक्षेत उत्तीर्णतेच्या नियमातही बदल झाला आहे.  


वेबसाईटवर याचिका 

विशेष म्हणजेच या निर्णयाविरोधात लॉ काऊन्सिलनं प्रकुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला पत्र देऊन हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंतीही केली होती. त्यानंतर  change.org या वेबसाईटवर ही ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली असून ८६० विद्यार्थ्यांच्या सह्या करून हा नवा पॅटर्न रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र विद्यापीठानं अद्याप कोणतही पाऊल न उचलल्यानं आता त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 



विद्यापीठ प्रशासनानं सुरू केलेल्या या नव्या परीक्षा पद्धतीनुसार, विद्यार्थी उत्तीर्ण होणं अधिकच सोप होणार असलं तरी या नव्या पॅटर्नमुळं लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळणार आहे. त्याशिवाय विद्यापीठानं पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही परीक्षा घेऊ नये असा आदेश दिला असतानाही काही कॉलेज मनमानी पद्धतीनं परीक्षा घेत आहेत. त्यामुळं जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत विद्यापीठ किंवा कॉलेजनं या परीक्षा पद्धतीनुसार कोणतीही परीक्षा घेऊ नये
-  सचिन पवार, अध्यक्ष,  स्टुडंट लॉ काऊन्सिल



हेही वाचा -

यंदा शाळेला दिवाळीची सुट्टी कमी

केंद्र प्रमुखांनी शिक्षणदूत व्हावे - शिक्षण मंत्री




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा