Advertisement

समर्थच्या डोळ्यात का आलं पाणी?

मकरंदने जेव्हा बाळूची भूमिका साकारणाऱ्या समर्थला विचारलं की, मालिकेमध्ये तुझी निवड झाली तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यावर समर्थ म्हणाला, बाबांना आवडलं नाही आणि ते म्हणाले नको करू, पण माझ्या मामांनी मला प्रोत्साहन दिलं.

समर्थच्या डोळ्यात का आलं पाणी?
SHARES

'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाची भूमिका साकारणाऱ्या मकरंद अनासपुरेने आजवर महाराष्ट्रातील बऱ्याच नामवंत व्यक्तिमत्त्वांचे अंतरंग उलगडली आहेत. नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सर्वांनीच या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे, पण 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत बाळूची भूमिका साकारणाऱ्या समर्थला मकरंदने एक प्रश्न विचारला तेव्हा उत्तर देताना त्याचे डोळे पाणावले.


बाबांना आवडलं नाही 

या आठवड्यामध्ये 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेची टीम या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे. यावेळी ते काही अनुभव, माहिती नसलेले किस्से देखील सांगणार आहेत. मकरंदने जेव्हा बाळूची भूमिका साकारणाऱ्या समर्थला विचारलं की, मालिकेमध्ये तुझी निवड झाली तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यावर समर्थ म्हणाला, बाबांना आवडलं नाही आणि ते म्हणाले नको करू, पण माझ्या मामांनी मला प्रोत्साहन दिलं... याचं उत्तर देताना समर्थला अश्रू अनावर झाले. 


गधा भाई

मालिकेच्या सेटवर कलाकारांची प्राण्यांशी चांगलीच मैत्री झाली आहे. मालिकेमध्ये सत्यवाची भूमिका साकारणाऱ्या साजरीने प्रत्येक प्राण्याला एक खास नाव ठेवलं आहे. गाईचं नाव तांबडी आणि कपिला तांबडीचं वासरू आहे जे खूपच गोंडस आहे. त्याच नाव चिंगु ठेवलं आहे. तसंच घोड्याचं नाव राजा आणि घोडीचं परी नाव आहे. गाढवदेखील आहे. त्याचं नाव सगळ्यात खास आहे 'गधा भाई'. 


अद्भुत किस्सा

या मालिकेच्या शूट दरम्यान झालेला एक अद्भुत किस्सा देखील यावेळेस सांगितला. अचानक शूटच्या दरम्यान मेंढ्या गायब झाल्या. खूप शोधल्या तरी त्या मिळाल्या नाहीत. पण दुसऱ्या दिवशी मात्र त्या सगळ्या मेंढ्या सेटवर परतल्या. या घटनेनंतर कळाले की, जंगलामध्ये ज्या ठिकाणी या मेंढ्या होत्या त्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असतो. परंतु त्या बाळूमामाच्या मेंढ्या असल्याने त्यांना काहीच झालं नाही. आणि त्या सुखरूप परतल्या. 


खरोखरच चमत्कार 

त्यावर संतोष अयाचित म्हणाले की, ज्या मामांनी आम्हाला मेंढ्या आणि इतर प्राणी पाठवले त्यांना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं की, आम्ही मेंढ्याची काळजी नाही घेऊ शकलो. त्यावर ते म्हणाले, 'काही काळजी करू नका. त्या बाळूमामांच्या मेंढ्या आहेत त्यांना हात लावणं इतकं सोपं नाही.' हा खरोखरच एक चमत्कार आहे असं म्हणावं लागेल. 


आवडती आणि खटकणारी गोष्ट 

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेसोबतच 'मुंबई पुणे मुंबई ३' या चित्रपटाच्या टीमनेही या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या दोघांनी देखील धम्माल किस्से सांगितले. स्वप्नीलने त्याचा रामानंद सागर यांच्याबरोबचा किस्सा सांगितला. त्याची या क्षेत्रामध्ये कशी एन्ट्री झाली हे देखील सांगितलं. मुक्ता आणि स्वप्नील यांनी अंकुश चौधरी, सह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी–सई ताम्हणकर तसंच सतीश राजवाडे यांच्याबद्दल एक आवडती आणि एक खटकणारी गोष्ट देखील सांगितली.



हेही वाचा - 

'नवरा असावा तर असा' चं त्रिशतक!

आला रे आला 'सिम्बा' आला...




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा