कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस त्यांच्या वादाला वेगळं वळण मिळत आहे. या सर्व वादात अनेक कलाकारांनी उड्या घेतल्या. पण या प्रकरणावर हृतिकनं वक्तव्य करणं टाळलं होतं. पण आता हृतिकनं याप्रकरणी आपली चुप्पी तोडली आहे. हृतिकनं तीन पानांचं पत्र ट्वीटरवर शेअर केलं आहे. या पत्रात कंगनानं केलेल्या आरोपांचं हृतिकनं खंडन केलं आहे.
— Hrithik Roshan (@iHrithik) October 5, 2017
'मी आणि कंगनानं चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण आम्ही कधीच एकटे भेटलो नाही. माझ्या अफेअर्सबद्दल पसरलेल्या अफवांमुळे मला काहीही फरक पडत नाही किंवा मी किती चांगला आहे, हे सांगण्याचा देखील मी प्रयत्न करत नाही. मी फक्त माझं सत्य जगासमोर मांडत आहे. मी सारे पुरावे सायबर क्राइमच्या स्वाधीन केले आहेत. सायबर क्राइम याची योग्य पडताळणी करेल. जगासमोर नक्कीच सत्य येईल. मी माझी पूर्वपत्नी सुजैन खान आणि वडील राकेश रोशन यांचे आभार मानतो. या परिस्थितीत त्यांनी माझी साथ दिली.'
'सात वर्ष आमचे अफेअर होतं असा आरोप माझ्यावर करण्यात आला. पण याचा एकही फोटो मीडियात आला नाही. जानेवारी २൦१४ साली पॅरिसमध्ये आमचा साखरपुडा झाला, अशा अफवा देखील पसरवण्यात आल्या होत्या. पण याचा एकही पुरावा नाही. साखरपुड्याचे फोटो किंवा कुणी आम्हाला पाहिलं देखील नाही.'
हृतिक रोशननं शेवटी लिहिलं की, 'मी कुणालाही जज करत नाही. पण सत्य जगासमोर येणं गरजेचं आहे. सत्य जगासमोर येत नाही, तोपर्यंत इतरांना, माझ्या कुटुंबियांना आणि मुलांना याचा त्रास होणार.'
हेही वाचा