Advertisement

कंगना आणि आदित्यच्या 'त्या रात्री'ची कहाणी प्रत्यक्षदर्शीच्या जुबानी


कंगना आणि आदित्यच्या 'त्या रात्री'ची कहाणी प्रत्यक्षदर्शीच्या जुबानी
SHARES

"त्याने भररस्त्यात तिचे केस पकडले आणि तिला जबरदस्ती घेऊन जाऊ लागला. ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नाही तर कंगना रणौत होती आणि तो व्यक्ती आदित्य पांचोली होता,”असा दावा एका प्रत्यक्षदर्शीने केला आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत या प्रत्यक्षदर्शिने त्या रात्री कंगना आणि आदित्यमध्ये नेमके काय घडले याचा खुलासा केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावरही त्यासंबंधीच्या चर्चांना उधाण आले आहे.



"जुहूच्या जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलबाहेर एक मुलगी रिक्षामधून मदतीसीठी आवाज देत होती. चालकाला ती रिक्षा वेगाने चालवण्यास सांगत होती. पण तितक्यात एका व्यक्तीने आपली गाडी रिक्षापुढे आणली आणि रिक्षा थांबवली. गाडीतून उतरून त्या व्यक्तीने त्या मुलीचे केस पकडून तिला रिक्षाबाहेर खेचले. ती मुलगी म्हणजे कंगना रणौत आणि तो व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नाही तर आदित्य पांचोली होता," असा दावा प्रत्यक्षदर्शीने केला आहे. एवढेच नाही तर प्रत्यक्षदर्शीनुसार, "कंगनाने माझ्याकडे मदत मागितली. हा सर्व प्रकार पाहून मी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने मला खडसावले की, सरदारजी तुम बीचमें मत पडो. ये हमारा घरका मामला है. यावर मी त्याला म्हटले की, घरातला वाद घरातच मिटवा. त्यावेळी आदित्य खूप चिडला होता. पण इतर लोकांच्या मदतीने मी त्याला पकडून ठेवले होते. या सर्वात कंगनाने तिकडून घाबरून पळ काढला. त्यानंतर मी पोलिसांना आणि काही पत्रकारांना कळवले होते," असा खुलासाच प्रत्यक्षदर्शीने दुसऱ्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत केला आहे


कंगनाने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीची सध्या बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. या मुलाखतीत कंगनाने हृतिक रोशन आणि आदित्य पांचोली यांच्यावर अनेक आरोप केले होते. यावर हृतिकने काही प्रतिक्रिया दिली नाही. पण आदित्य पांचोलीने मात्र सर्व आरोप धुडकावले. "माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे असून कंगना वेडी झाली आहे," असा आरोप त्याने केला



आता प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यावरून या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. या प्रकरणानंतर बॉलुवूडमधले अर्ध्याहून अधिक कलाकार मंडळी 'क्वीन' कंगनाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. पण हा प्रत्यक्षदर्शी कंगनाच्या पाठिशी असल्याने येत्या काळात कंगनाची कहाणी काय वळण घेते यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. पण या प्रकरणानंतर एक म्हणावे लागेल की, झगमगाट आणि प्रसिद्धीच्या गर्तेत अडकलेल्या बॉलिवूडचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला



हेही वाचा -

'त्याने' मला लग्नाचे वचन दिले होते, पण... - कंगना

अमिताभच्या जागी 'हा' कलाकार करणार केबीसीचं सूत्रसंचालन




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा