बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अलीकडेच तिची बहुचर्चित वेब सीरिज 'पाताललोक' रिलीज झाली. या वेबसीरिज खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
पण आता 'पाताल लोक' या वेबसीरिजवरून वाद निर्माण झाला आहे. शोची निर्माती अनुष्का शर्माला कायदेशीर नोटीस पाठविली गेली आहे. वेब सीरिजमधील संवादावरुन हा वाद निर्माण झाला असून त्यामुळे नेपाळी समुदायाचा अपमान झाल्याचं म्हटलं गेलं आहे.
अनुष्का शर्माला १८ मे ला पाठवलेल्या या नोटीसमध्ये वीरेन सिंह गुरुंग यांनी या वेबसीरिजमध्ये जाती सूचक शब्दांचा वापर केला गेला असल्याचा आरोप केला आहे. ज्यामुळे नेपाळी समुदायाचा अपमान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. वीरेन यांनी सांगितलं, या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये ३ मिनिटं आणि ४१ सेकंदांच्या चौकशी दरम्यान एक महिला पोलिस संबंधित नेपाळी भूमिका साकारलेल्या व्यक्तीला जातीवादी शिव्या देते.
Appeal to all the General Public!
— Bharatiya Gorkha Yuva Parisangh (@BhaGoYuP) May 20, 2020
Please sign our petition and share:https://t.co/ErtxCr1r8v#NEStereotyped#StopRacism#Patallol pic.twitter.com/kR9YKwQ1al
वीरेन यांनी सांगितलं की त्यांना नेपाळी शब्द या वेबसीरिजमध्ये वापरल्याबद्दल कोणतीही समस्या नाही. पण त्यानंतर जो शब्द वापरला गेला आहे त्याला त्यांचा विरोध आहे. नेपाळी ही 22 अनुसूचित भाषांपैकी एक आहे आणि भारतात दीड कोटी लोक नेपाळी भाषा बोलतात. भारतात गोरखा समुदाय सर्वाधिक नेपाळी भाषा बोलणारा समुदाय आहे आणि या वेब सीरिजमध्ये वापरलेल्या या शब्दांमुळे त्यांचा अपमान झाल्याचं वीरेन यांचं म्हणणं आहे आणि यासाठी अनुष्कानं माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
गोरखा समुदायने जातीवादक शब्द वापरल्यामुळे नाराजी व्यक्त केली असून हा शब्द सीरिजमधून काढून टाकण्यात यावा अशी मागणीही केली आहे. या प्रकरणात, गोरखा समुदायाकडून १८ मे रोजी या विरोधात ऑनलाइन याचिका दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच सीरिजमधून हा शब्द म्यूट करण्यात यावा आणि सबटायटलमध्ये तो ब्लर करुन एडिटेड एपिसोड अपलोड करण्याची मागणी केली आहे.
'पाताल लोक' ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम वर १५ मेपासून सुरु झाली आहे. 'पाताललोक'मध्ये जयदीप अहलावत, नीरज काबी, अभिषेक बनर्जी, स्वस्तिका मुखर्जी, निहारिका, जगजीत, गुल पनाग या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या वेब सीरीजचं लेखन सुदीप शर्मानं केलं आहे. ही वेबसीरिज अमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात आली आहे.
हेही वाचा