मुंबई - आयएनटी स्पर्धेत फेरबदल करण्याची संकल्पना आयएनटी संचालक प्रविण भुरे यांनी मांडलीय. आयएनटी स्पर्धांच्या तीन फेऱ्यां ऐवजी दोनच फेऱ्या घेण्यात याव्यात अशी ही संकल्पना आहे. मराठी चित्रपट सृष्टीला दर्जेदार विषय मिळावे आणि आयएनटीमधील उत्सुकता वाढावी हा या मागचा उद्देश आहे. पण याबाबतचा अंतिम निर्णय प्रेक्षकच घेतील. बहुमताने प्रेक्षकांची पत्रे आयोजकांकडे आली तर पुढच्या वर्षी नव्या प्रकारात आयएनटी सादर होईल.